AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, केंद्र सरकार गप्प का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray on Bangladesh Hindu News : उद्धव ठाकरे यांनी बांग्लादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य केलं आहे. त्यांनी मोदी सरकारला काही सवाल केले आहेत. बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, केंद्र सरकार गप्प का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. वाचा...

बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार, केंद्र सरकार गप्प का?; उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: ANI
| Updated on: Dec 13, 2024 | 1:40 PM
Share

बांग्लादेशमध्ये सध्या परिस्थिती चिघळली आहे. बांग्लादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदुंसह इतर समुदायांवर अत्याचार होत आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला सवाल केलेत. बांगलादेशात हल्ला होत आहे. इस्कॉन मंदिर जाळलं. तरी गप्प आहोत. इस्कॉनच्या प्रमुखाला अटक होते तरी गप्प, रोज हिंदूंवर अत्याचार होत आहे. आपण गप्प का. आपले विश्व गुरू अत्याचार का पाहत आहे. मोदींना विनंती आहे. युक्रेनचं युद्ध एका फोनवर थांबवलं तसं हिंदूंवर अत्याचार होत आहे तर बांगलादेशबाबत भूमिका घेतली पाहिजे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरेंचं बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर भाष्य

सत्ताधारी आणि विरोधक देशाच्या दृष्टीने विषय मांडत आहेत. सत्ताधारी उत्तर देत आहे. असं म्हणतात. पण दुर्देवाने असं होत नाही. महत्त्वाच्या विषयांना बगल देऊन चर्चा नको त्या दिशेने भरकटवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे. हल्ले होत आहे. दोन तीन महिन्यापूर्वी बांगलादेशचा संघ आला होता. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असेल तर त्या संघासोबत खेळणं कितपतयोग्य आहे असं आदित्य म्हणाला होता. पण त्यावर उत्तर नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे. इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे. हिंदू म्हणजे नुसती मतं नाही. त्यांना भावना आहे. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्यांचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी होता का?यांचं हिंदुत्व मतांपुरतं आहे. हिंदुंची मते हवी. त्यांना भयभीत करायचं. घाबरवायचं आणि सत्तेत आल्यावर स्वत मंदिरं पाडायचं. मंदिरं कुठे सेफ आहेत. बांगलादेशात नाही आणि मुंबईतही नाही. एक है तो सेफ है म्हणता मग मंदिर कुठे सेफ आहे. महाराष्ट्र बेकारीत एक नंबरवर आहे. त्यात हिंदू आहे की नाही. आपल्या मुंबईतील मंदिर पाडण्याचा फतवा रेल्वे काढत आहे. तेव्हा फडणवीस आणि भाजपचं हिंदुत्व काय करत आहे. सिडकोचा मंदिराच्या भुखंडावर डोळा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.