AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे आहेत. पंकजा ताई तू फार मोठं काम केलंस, आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्याय देवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि स्वत: च्या डोळ्यांवर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे, तू फार मोठं काम केलंस', ठाकरे नेमकं काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 9:23 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बीकेसीत जाहीर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते पंकजा मुंडे यांचा उल्लेख करत आभार मानले. त्यावर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “जे संजय राऊत बोलले की, 23 तारखेला आपण जिंकणार आहोतच आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत. पण जर महाझुटी जिंकली तर गुजरातला फटाके वाजतील. मी सगळ्या गुजराती वर्गाला आणि व्यापारी वर्गाला दोषी धरत नाही. पण पंकजा मुंडे काल बोलल्या आहेत. तो व्हिडीओ सुद्धा आहे. मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे आहेत. पंकजा ताई तू फार मोठं काम केलंस, आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्याय देवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आणि स्वत: च्या डोळ्यांवर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

“पंकजा मुंडे यांनी काय सांगितलं आहे की, भाजपचं काम म्हणजे त्यांचे शब्द वेगळे आहेत. मी तुम्हाला त्याचा फक्त अर्थ सांगतो. भाजपचं काम लय भारी असतं बघा. आपल्याकडे बुथ किती आहेत? तर 90 हजार. प्रत्येक बुथवरती भाजपचं दक्षता पथक आहे. पथक म्हणजे एक पेक्षा अधिक माणसं. एक माणूस जरी धरला तरी 90 हजार बुथवर 90 हजार माणसं. 2 धरली तर 1 लाख 80 हजार, 3 धरती तर त्याच्या पटीत. सगळी माणसं गुजरातमधून भाजपने इकडे महाराष्ट्रात आणली आहेत, म्हणजे आपल्यावर नजर ठेवायला. ते आज नजर ठेवायला आले आहेत, उद्या त्यांचा आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा डाव आहे. हे तर फेक नरेटिव्ह नाही ना? हे उद्धव ठाकरे पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘बॅग कंपनीचा मला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवा’

“याचा अर्थ असा की, इथे भाजप हरलेली आहे. इथे भाजप राहिलेली नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजप प्रेमींवर भाजप नेतृत्वावर विश्वास नाही. मग तो मराठी माणसावर नाही, गुजरातीवर नाही, उत्तर भारतीयांवर नाही. कुणावरच नाही. ते आता परराज्यातून माणसं आणून नजर ठेवत आहेत. मी अनेक वेळा निवडणुका बघितल्या. अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे. पण या निवडणुकीत किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली आहे. खरं म्हणजे त्या बॅगच्या कंपनीला पत्र लिहिणार आहे की, तुमच्या बॅग कंपनीचा मला ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवा. बँड अ‍ॅम्बेसिडर उद्धव ठाकरे. बॅग हो तो ऐसी हो, सबको लगे इसे चेक करो”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

हे सुद्धा वाचा

“माझी बॅग तपासली, हरकत नाही. पण हे जे लोकं बॅग तपासत आहेत, ते रात्री राहतात कुठे? त्यांचा खर्च कोण करतोय? ते ज्या बॅगा घेऊन फिरत आहेत त्या बॅगेतील ढोकळे आणि शेव-पापड्या कुठून आणले आहेत? कोणासाठी फिरत आहेत, कुणाला काय वाटत आहेत? याआधीच्या निवडणुकांमध्ये मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी बाहेरच्या राज्यातील फौज अद्याप आणलेली नव्हतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.