AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | पुढचे 3 ते 4 तास अतिमहत्त्वाचे, महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट, काळजी घ्या

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज धुवांधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून पुढच्या काही तासांसाठी अलर्टही जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain | पुढचे 3 ते 4 तास अतिमहत्त्वाचे, महाराष्ट्रातील 'या' सहा जिल्ह्यांना अलर्ट, काळजी घ्या
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 2:58 PM

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात हवा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले होते. याशिवाय धरणांमधील पणासाठा देखील संपत आल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. पाऊस पडला नाही तर भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या संकटाला सामोरं जावं लागेल, अशी भीती वर्तवली जात होती. त्यामुळे सर्वजण पाण्याची चातकासारखी वाट पाहत होती. अखेर सर्वांची हाक पावसाने ऐकली आणि गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावासाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच मुसळधार कोसळतोय. पण त्याचं हे कोसळणं जरुरुीचं आहे. कारण अजूनही हवा तितक्या स्वरुपात पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरेशा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांच्या नागरिकांना पुढच्या तीन ते चार तासांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालंय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पोहोचला नसला तरी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुणे या सहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. या सहा जिल्ह्यांसाठी पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे आहेत.

हवामान विभागाचा नेमका अलर्ट काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे या सहा जिल्ह्यांमधील अनेक भागांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरुपांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही पाऊस हवा तसा पोहोचू शकलेला नाही. अनेक ठिकाणी पाऊस हा रिमझिम पडताना दिसतोय. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकं पूर्णपणे करपली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला सरकारकडे आशा आहे. सरकार दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.