AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय. ओबीसी समाजाताली तरुणांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं निवासस्थान असलेल्या प्रकाशगड इथं आंदोलन सुरु केलं आहे.

महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक
| Updated on: Dec 21, 2020 | 3:09 PM
Share

मुंबई: मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. महावितरणमध्ये 327 कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी ओबीसी समाज आक्रमक झालाय. 11 महिन्यांपूर्वी निवड झाली मात्र अद्यापही नियुक्तीपत्र मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजाताली तरुणांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं निवासस्थान असलेल्या प्रकाशगड इथं आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनीही उपस्थिती लावली.(Youth agitation in OBC community against the Ministry of Energy)

मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत सगळी भरतीप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याचा फटका इतर समाजालाही बसतोय, असं मत शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर ओबीसी समाजातील तरुणांना नोकरी दिली नाही तर राज्यात फिरु देणार नाही. ओबीसीच्या साडे आठ हजार मुलांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत तर त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार, असा इशाराही शेंडगे यांनी दिला आहे.

परीक्षा दिली, पासही झाले पण ओबीसी समाजातील उमेदवारांना अद्याप नियुक्त्या नाहीत. आंदोलन केल्यानंतर डायरेक्टरने आश्वासन दिलं की नियुक्ती पत्र जारी करु, पण विद्युत सहाय्यकांच्या निर्णय प्रलंबित ठेवला. त्यांचा निकाल का थांबवला, असा सवालही शेंडगे यांनी विचारलाय.

समीर भुजबळांच्या भूमिकेला विरोध

राष्ट्रवादीचे नेते समीर भूजबळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याला ओबीसी नेत्यांचा पाठिंबा नाही. आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही. ओबीसींच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरुच राहणार, असा दावाही शेंडगे यांनी केलाय. सरकार फक्त आश्वासनावर बोळवण करण्यात मग्न आहे. हे थांबलं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिलाय.

औरंगाबादेतील आंदोलनाचं रुपांतंर आभार मोर्चात!

औरंगाबादमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. माजी खासदार समीर भुजबळ मोर्चात सहभागी झाले. महात्मा फुले पुतळ्यापासून सुरु होणाऱ्या मोर्चासाठी अनेक ओबीसी बांधव उपस्थित राहिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं आश्वासन सभागृहात दिल्यामुळे आम्ही आजचा ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा आभार मोर्चात बदलत आहोत, असं समीर भुजबळ यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

…आणि समीर भुजबळांच्या ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’चं स्वरुप बदललं

Youth agitation in OBC community against the Ministry of Energy

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.