AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाऊंगा भी, खिलाऊंगा और खानेवाले को सुरक्षा दुंगा, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अमृता फडणवीसांनीही डिवचलं

अमृता फडणवीसही (Amruta Fadnavis) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार बरसल्या. तसं अनेकदा अमृता फडणवीस ट्विटरवरून महाविकास आघाडीवर वारंवर निशाणा साधत असतात. मात्र टीका करण्याचा आणि आरोप करण्याचा पत्नी-पत्नीचा योग चांगलाच जळून आला होता.

खाऊंगा भी, खिलाऊंगा और खानेवाले को सुरक्षा दुंगा, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अमृता फडणवीसांनीही डिवचलं
अमृता फडणवीसांची पुन्हा महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 24, 2022 | 8:09 PM
Share

मुंबई : गुरूवारच्या विधानसभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आरोपांची मोठी फाईल उघडली. एकापाठोपाठ एक एवढे आरोप केले की महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात डोकं पकडायची वेळ आली असेल. फडणवीस बोलून काही मिनिटच झाली होती. तेवढ्यात अमृता फडणवीसही (Amruta Fadnavis) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार बरसल्या. तसं अनेकदा अमृता फडणवीस ट्विटरवरून महाविकास आघाडीवर वारंवर निशाणा साधत असतात. मात्र टीका करण्याचा आणि आरोप करण्याचा पत्नी-पत्नीचा योग चांगलाच जळून आला होता. महाविकास आघाडीवर भ्रष्टाचारापे आरोप करताना, खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालो को सुरक्षा भी दूंगा, असेच काहीसे महाराष्ट्राचे सध्याचे वातावरण आहे. म्हणत त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीला चिमटे काढले आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणा निष्पक्ष

मात्र हे आता बंद झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचं राजकारण हवा आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे, असे अमृता फडणवीसांनी ठणकावले आहे. जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात. तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात. तेव्हाच ते कारवाई करतात आणि ते निष्पक्ष पद्धतीनेच तपास करतात, असे सर्टीफिकटही त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना देऊन टाकले. आता आपण आता बोलून काही उपयोग नाही. या सर्व चौकशांचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यावर कळेलच, असेही त्या म्हणाल्या. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतून सुरू आहेत, असा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवर करण्यात येत आहे. त्यालाच अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

फडणवीसांचीही जोरदार फटकेबाजी

मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे. असे म्हणत फडणवीसांनी सुरूवातील जोरदार हल्लाबोल चढवला.

Devendra Fadnavis: ही हिंमत, अजित पवारांबद्दल, तीही पुण्यात? फडणवीसांनी ती घटना पुन्हा सभागृहात सांगितली

Devendra Fadnavis: ‘दादांचीही’ नसेल एवढी… बारामती ते मुंबईपर्यंत प्रॉपर्टी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कुंडली फडणवीसांनी मांडली, मलिक कनेक्शन?

Breaking News: मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.