Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

नदीतील पाणी पाहून तिथं खेळायला लागले. नदीत पाणी खोल असल्याची त्यांनी कल्पनाच आली नाही. पाण्यात खेळत असताना दोघेही बुडाले. दोघांचेही कपडे नदीच्या बाजूलाच होते.

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली
हिंगणा तालुक्यातील कृष्णा नदीचा परिसर.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:27 AM

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गणेशपूर (Ganeshpur in Hingana taluka) नावाचं गाव आहे. या गावात रूस्तम खान राहतात. रिजवान (वय अकरा वर्षे) हा त्यांचा भाचा व इमामुल (वय आठ वर्षे) खान हा त्यांचा मुलगा दोघेही इमामुलच्या आईसोबत सरपण गोळा करायला गेले. काही वेळ दोघांनीही मदत करून लागली. सोमवारी दुपारची घटना. संबंधित महिला कृष्णा नदीच्या परिसरात (In the vicinity of the river Krishna) सरपण गोळा करत होती. काही वेळात रिजवान आणि इमामुल हे दोघेही बाजूलाच असलेल्या क्रिष्णा नदीच्या काठावर गेले. नदीतील पाणी पाहून तिथं खेळायला लागले. नदीत पाणी खोल असल्याची त्यांनी कल्पनाच आली नाही. पाण्यात खेळत असताना दोघेही (Both drowned while playing) बुडाली. दोघांचेही कपडे नदीच्या बाजूलाच होते.

मुलांनी सोबत येण्याचा केला होता हट्ट

इकडे इमामुलच्या आईने बालकं दिसत नाही म्हणून शोध घेतला. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे कपडे दिसले. त्यावरून ही मुलं नदीत उतरली असावीत, असं तिला वाटलं. तिचा जीव कासावीस झाला. मुलांना येऊ नको, असं तीनं घरीच म्हटलं होतं. पण, मुलांनी हट्ट केला. शिवाय घरी मुलं कुणासोबत वेळ घालवणार हा प्रश्न होताच. दोन्ही मुले लहान होती. त्यांना पोहता येत नव्हते. गंमत म्हणून पाण्यात उरतले असावेत. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. लहान मुलांना सोबत घेऊन जाताना त्यांच्या आईवडिलांना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशाप्रकारच्या घटना होण्यास वेळ लागत नाही.

दोघांचेही मृतदेह बाहेर काढले

पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड व एमआयडीसीचे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका मुलाला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या मुलालाही बाहेर काढण्यात आले. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस

LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना

शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का
शिक्षकाने FB पोस्ट लिहिली अन् संपवलं आयुष्य, कारण ऐकून बसेल धक्का.
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.