AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सगळे मिळून सभा यशस्वी करणार;’मविआ’तील नेत्यानं या सभेविषयी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं

महाविकास आघाडीच्या सभेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची ही सभा आठ एकरात होत आहे. त्यामुळे एक लाख लोकं येतील, त्याच बरोबर संभाजीनगरपेक्षाही मोठी सभा ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सगळे मिळून सभा यशस्वी करणार;'मविआ'तील नेत्यानं या सभेविषयी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितलं
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 7:06 PM
Share

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी, मालेगावमध्ये सभा झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमध्येही जंगी सभा होणार आहे. त्यामुळे आता ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील नेते सभेच्या तयारीला लागले आहेत. त्यातच काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे की, महाविकास आघाडीची ही सभा आम्ही सगळे मिळून ही सभा यशस्वी करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. त्यामुळे या सभेतही उच्चांकी गर्दी होणार असून विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्यांसह नेते सभेला उपस्थित राहणार असल्याचा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, रत्नागिरी आणि मालेगावमधील सभेप्रमाणेचयाही सभेत मोठी गर्दी होणार असल्याचे त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते या वज्रमूठ सभेसाठी येणार असून या सभेसाठी संपूर्ण विदर्भातील लोकं सभेला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारबरोबरच केंद्रातील भाजपच्या सरकारलाही लोकं कंटाळली आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात परिवर्तन झाल्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि केंद्रावर निशाणा साधताना त्यांनी जातीपातीवरून चाललेल्या राजकारणावरूनही केंद्राला घेरले आहे. त्यामुळे जात-पात धर्मात दरी निर्माण करणाऱ्यांना धरीत ढकलल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास असल्यामुळेच असंख्य नागरिक त्यांच्या सभेसाठी जमा होत असतात. त्याच बरोबर शिंदे-फडणवीस सरकारने ज्या प्रकारे अनेक सवाल उपस्थित करून ठेवले आहेत.

त्याच प्रमाणे अनेक अनुत्तरित प्रश्नांचीही उत्तरं या सभेत देण्यात येतील असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. त्याच बरोबर ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही या सभेला येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जातात मात्र हे आरोप करताना सत्ताधाऱ्यांची संकुचित वृत्ती दिसून येते आहे असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

विरोधकांवर टीका करणे, महाविकास आघाडीवर टीका करणे एवढचं काम सध्या सत्ताधारी करत आहेत. मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब सुरु असल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

यावेळी महाविकास आघाडीच्या सभेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांची ही सभा आठ एकरात होत आहे. त्यामुळे एक लाख लोकं येतील, त्याच बरोबर संभाजीनगरपेक्षाही मोठी सभा ही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.