AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेठबिगारी करण्यासाठी 6 हजार आणि 2 मेंढ्या दिल्या; नंतर अत्याचार एवढा झाला की, मुलगी मरूनच गेली, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गंभीरता सांगितली…

छगन भुजबळ म्हणाले की, इतकी वर्षे आपण आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो. तरीही त्यांचा विकास का होत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

वेठबिगारी करण्यासाठी 6 हजार आणि 2 मेंढ्या दिल्या; नंतर अत्याचार एवढा झाला की, मुलगी मरूनच गेली, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गंभीरता सांगितली...
| Updated on: Dec 21, 2022 | 3:56 PM
Share

नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासूनच विरोधकांकडून अनेक प्रश्नांवरू सरकारला धारेवर धरणार असल्याचे सांगितले जात होते. हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून प्रश्न मांडताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी वेठबिगारीवर सवाल उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. वेठबिगारी किती भयानक आणि तिने किती गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे हे सांगताना त्यांनी कातकरी समाजाचे नुकताच घडलेल्या घटनेचे उदाहरण दिले. त्यावेळी सरकारच्या बाजूनेही त्यांच्या मागण्या मान्य करून मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्यांना मदत करण्याचे अश्वासन देण्यात आले आहे.

यावेळी छगन भुजबळ यांनी चार ते पाच सवालही उपस्थित करून याबाबत सरकार काही उपाय करणार की नाही असा सवाल उपस्थित केला आहे.राष्ट्र

वादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजातील कातकरी समाजाचे भीषण वास्तव सांगताना त्यांनी एक उदाहरण दिले. यावेळी ते म्हणाले की, कातकरी समाजातील एका कुटुंबातील मुलींना सहा हजार आणि मेंढ्या देऊन वेठबिगारीसाठी विकत घेण्यात आले.

त्यावेळी त्यातील एका मुलीवर अत्याचार करण्यात आला, त्या अत्याचारामध्येच ती मुलगी मृत्यूमुखी पडली. वेठबिगारी करणाऱ्या त्या मुलींमधील एक मुलगी मरण पावल्यानंतरच ही घटना उघडकीस आली. त्यामुळे ही घटना तुम्हा आम्हाला मान खाली घालायला लावणारी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

या प्रकरणावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, इतकी वर्षे आपण आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी, त्यांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतो. तरीही त्यांचा विकास का होत नाही असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.

त्यामुळे खर्च करूनही सरकार या प्रकरणी काय कारवाई करणार , दिलेल्या पैशाचा उपयोग होणार आहे का? वेठबिगारी होते त्याच्यावर कठोर कारवाई का होत नाही असे सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.