AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार म्हणजे विषकन्या, सरकारची सावली पडली तरी प्रकल्प नष्ट होतो; नितीन गडकरी यांचं धक्कादायक विधान

शरद जोशी नेहमी म्हणायचे क्रॉप पॅटर्नचा अभ्यास करा. संशोधन करा. आज ते कठिण नाहीये, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते कृषी पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

सरकार म्हणजे विषकन्या, सरकारची सावली पडली तरी प्रकल्प नष्ट होतो; नितीन गडकरी यांचं धक्कादायक विधान
nitin gadkariImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 9:20 AM

नागपूर, दिनांक 16 जुलै 2023 : गॉड आणि गव्हर्नमेंट या दोघांवर आपला विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची सावली जरी ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो, या थिअरीवर माझा विश्वास आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. त्यामुळे सरकारपासून जो दूर राहील तोच प्रगती करू शकतो, असं मोठं आणि धक्कादायक विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सरकारमधील अडचणी ज्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. आता मांडलेल्या अनेक गोष्टी कटू सत्य आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे धक्कादायक विधान केलं. देशाचं कृषी उत्पन्न 22 टक्क्यावर नेण्याचं आज आपल्यासमोर सगळ्यात मोठे टार्गेट आहे. आणि हे ज्या दिवशी नेऊ, त्या दिवशी शेतकऱ्यांचे मजुरी 1500 रुपये होईल. याचं सगळ्यात मोठा कारण असं आहे की, हे करण्याकरता काही ग्रास रूट रियालिटी आहेत. माझं हे मत आजही नाही, मी विरोधी पक्षात होतो तेव्हाही माझं हेच मत होतं. आजही आहे. त्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की, गॉड आणि गव्हर्मेंट या दोघांवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. त्यामुळे मी पहिल्यांदा या थेरीचा समर्थक आहे, असं गडकरी म्हणाले.

परमेश्वराला माहिती

यावर्षी एमएसपी जी दिली त्यामध्ये अडचणी आहेत. मार्केट प्राईज आणि एमएसपी यामध्ये मार्केट प्राइस कमी आणि एमएसपी जास्त आहे. त्याचा बॅलन्स करण्याकरता दीड लाख कोटी द्यावे लागले. जे घेतलेल अन्न आहे ते ठेवायला, स्टोरेज करायला गोडाऊन बरोबर नाही. त्यातून किती सडलं? काय झालं? ते परमेश्वराला माहिती, असंही ते म्हणाले. मी काही त्यावर बोलत नाही. मी मंत्री असल्यामुळे मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारने काय केले पाहिजे, यावर शरद जोशींनी पॅटर्न ठरवला पाहिजे, हा पर्याय दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तोपर्यंत स्थिरता नाही

जोपर्यंत एका एकरात 20 क्विंटल कापूस होत नाही, जोपर्यंत एका एकरात कमीत कमी 15 क्विंटल सोयाबीन होत नाही, आणि कमीत कमी एका एकरात 30 टन संत्रा होत नाही. तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळेच उत्पादन वाढवलं पाहिजे. तरच शेतकऱ्यांना स्थिरता येईल, असंही त्यांनी सांगितलं. कोणत्याही देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यावरच भाव आधारीत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

व्हिजन तयार केलं पाहिजे

दुधाचा धंदा चांगला झाला तर त्याला गायी पाहिजे. पण आपल्याकडे गायी चांगल्या नाही. पुढल्या पाच वर्षात आपल्याला 25 लिटर दूध देणाऱ्या 25 हजार गायी तयार करायच्या आहेत. गायींसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहोत. तंत्राचा वापर करून दूधाचं उत्पादन वाढवलं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याबाबतचं व्हिजन तयार केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.