AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Vadettiwar | राज्यातील 29 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, नागपुरात विजय वडेट्टीवारांची माहिती, मास्क सक्तीबाबत आवश्यक्तेनुसार निर्णय

महाज्योतीच्या जागा भरणाऱ्याची परवानगी मिळालीय. कंत्राटी पद्धतीनं जागा भरायच्या आहेत. ओबीसी विभागात 350 जागा भरणार आहेत. आठ दिवसांत या जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघणार आहे.

Vijay Vadettiwar | राज्यातील 29 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, नागपुरात विजय वडेट्टीवारांची माहिती, मास्क सक्तीबाबत आवश्यक्तेनुसार निर्णय
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 12:15 PM

नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात नाहीच्या बरोबर आहे. कोरोनाच्या बाबतीत राज्यातील 29 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. सध्या पॅाझिटीव्ह (Positive) असलेल्या 96 टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणं नाहीत. 3-4 टक्के रुग्णांना सर्दी सारखं लक्षणं आहेत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन (Minister for Relief and Rehabilitation) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते म्हणाले, पुढचे व्हेरीयंट धोकादायक लक्षणं असलेले येऊ शकतात. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे, यावर काल कॅबिनेटमध्ये (Cabinet) चर्चा झाली. पण मास्क सक्तीबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. मास्क सक्तीबाबत आवश्यकतेवुसार मुख्यमंत्री निर्णय घेणार, असंही ते म्हणाले. सध्या राज्यात अशी परिस्थिती नाही की, आपण सरळ मास्कबंदी सुरू करावी. नवीन व्हेरिएंट धोकादायक असला, तरी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. कोणतीही गोष्टी सक्ती करून ती राबविली जाईल, असं नाही. गरजेनुसार, ज्यानी त्यानी योग्य निर्णय घ्यायचा असतो.

महाज्योतीच्या जागा कंत्राटी पद्धतीने

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाज्योतीच्या जागा भरणाऱ्याची परवानगी मिळालीय. कंत्राटी पद्धतीनं जागा भरायच्या आहेत. ओबीसी विभागात 350 जागा भरणार आहेत. आठ दिवसांत या जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघणार आहे. जीएसटीबाबत, केंद्र सरकारची जबाबदारी राज्यातील जनतेला दिलासा देणे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. आमचेच पैसे थकीत करणे आणि आम्हालाच उपदेश करणे, हे योग्य नाही, अस वडेट्टीवार यांनी खडसावून सांगितलं.

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी मदत का

राज्य सरकारकडून पंतप्रधान यांना विनंती असणार आहे. गुजरातसारख्या राज्याला केंद्राची जास्त मदत दिली जाते. गैरभाजप राज्यात अशी भूमिका घेणं चुकीचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यानं केंद्र सरकार कमी मदत देतात. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. कॅबिनेट बैठकीत, मराठा समाजाच्या मागण्याबाबत काल सकारात्मक चर्चा झाली. सत्ता गेल्याचा भाजपला पश्चाताप होतोय. कुणाबरोबरंही जाऊन त्यांना सत्तेची आवश्यकता आहे, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला लगावला.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.