AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बोगस जात प्रमाणपत्राबाबत कायद्यात तरतूद काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करारा जवाब

CM Eknath Shinde | मराठा समाजाच्या ओबीसी नोंदी सापडत आहे. नोंदी असणाऱ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले. पण बोगस कागदपत्रांच्या आधारे ओबीसी नोंदी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकरणात कायदा काय सांगतो हे स्पष्ट केले.

बोगस जात प्रमाणपत्राबाबत कायद्यात तरतूद काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करारा जवाब
| Updated on: Dec 19, 2023 | 6:24 PM
Share

नागपूर | 19 डिसेंबर 2023 : मराठा समाजाच्या आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात आज सरकारची बाजू मांडली. त्यांनी याप्रकरणी राज्य सरकार करत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या योजनांची आणि त्यासाठी केलेल्या निधीची तरतूद याची माहिती दिली. बोगस कागदपत्रांच्या आधारे ओबीसी नोंदी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयीची ओरड ओबीसी एल्गार मेळाव्याच्या मंचावरुन पण करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. अशा प्रकरणात कायदेशीर कारवाईचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला.

नोंदी आधारे कुणबी प्रमाणपत्र

राज्यात मराठा समाजाच्या ओबीसी नोंदी सापडत आहेत. त्याआधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मराठा जातीचा दावा करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम समिती करणार आहे. एखाद्या समाजाला मागासलेपण आले तर राज्य सरकारला मागासलेपण देण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द त्यांनी दिला.

कायदा काय सांगतो

जातीचे प्रमापत्र देण्यासाठीचा कायदा 2000 मध्ये आला. जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल. ती व्यक्ती त्या जातीची आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असल्याची तरतूद या कायद्यातील कलम 8 प्रमाणे आहे, हे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवले आणि तसे सिद्ध झाले तर असे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येते आणि त्या व्यक्तीने घेतलेले सर्व लाभ काढून घेता येतात. या कायद्यातील कलम 10 प्रमाणे ही कारवाई होते. तर ज्याने हे प्रमाणपत्र मिळवले, त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येते. 6 महिने ते 2 वर्षांचा सश्रम कारावास आणि दंडाची तरतूद यामध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे त्यांनी सांगितले.

कुणबी लिहलं आणि…

त्यामुळे कुणबी लिहलं आणि प्रमाणपत्र मिळवलं हे इतके सोपे नाही. असे करणारे अधिकारी, लाभार्थी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कोणीही मनात संभ्रम ठेऊ नये, साशंक असू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन कुणबी नोंदीची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी आश्वस्थ केले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.