AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्धा कार दुर्घटनेचे नेमके कारण काय?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले चौकशीचे आदेश

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. हा अपघात नेमका कशामुळे झाला. रोड इंजिनिअरिंगचे कारण आहे की आटोमोबाईल इंजिनिअरिंगचे की, इतर कारणे आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वर्धा कार दुर्घटनेचे नेमके कारण काय?; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले चौकशीचे आदेश
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 2:02 PM
Share

गोंदिया : 25 जानेवारी रोजी वर्धा येथे कार अपघात (Car accident at Wardha) झाला. या अपघातात 7 विद्यार्थी डॉक्टरांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी दिले. हा अपघात नेमका कशामुळे झाला. रोड इंजिनिअरिंगचे कारण आहे की आटोमोबाईल इंजिनिअरिंगचे की, इतर कारणे आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलाच्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या घरी सांत्वन देण्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, देशात वर्षाला 5 लाख अपघात होतात. 3.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्त्याच्या सुरक्षा नियमाचे सजकतेने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटकमध्ये रस्ता अपघात आणि मृत्यू 50% कमी केले आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

असा झाला होता अपघात

देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा पंचेवीस जानेवारीला अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला. या अपघातात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता. सर्व मेडिकलचे विद्यार्थी असून ते एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. वेगवेगळ्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची कार नदीच्या पुलावरुन चाळीस फूट खोल दरीस कार कोसळून अपघात झाला होता. नीरज चौहान हा कार चालवत होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या अपघातानंतर विद्यार्थ्यांचा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तब्बल चार तासांचा अवधी लागला.

संबंधित बातम्या :

Photo | कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!

बर्थडे सेलिब्रेट करायला गेले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! वर्ध्यातील अपघाताचा अंगावर काटा आणणार घटनाक्रम

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.