AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | देश विकणारे दिल्लीत, भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर; पटोलेंचा घणाघात, अण्णा हजारेंबाबत काय म्हणाले…?

नाना पटोले म्हणाले की, मोदींनी माफी मागितल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही आंदोलनाचा आव आणत नाही आहोत. देश विकणारे सरकार दिल्लीत बसले आहेत. त्या सरकारला आमचा आवाज गेला पाहिजे. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे.

Video | देश विकणारे दिल्लीत, भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर; पटोलेंचा घणाघात, अण्णा हजारेंबाबत काय म्हणाले...?
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 11:25 AM
Share

मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत भाजपला घेरले आहे. भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आता समोर येतोय. कारण भाजपचे नेते चुकीच्या वक्तव्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी माफी मागावी, एवढी आमची भूमिका आहे. आम्ही हिसेंचे समर्थन करतोय, असे तर काहीच नाही. भाजपचा महाराष्ट्रद्रोही चेहरा आता जनतेसमोर आला आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत, अशा इशारा त्यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे (Congress) कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले होते. या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी काँग्रेस जोरदार निदर्शने करतेय. एकंदर काँग्रसने या प्रकरणावरून भाजपला कोंडीत पकडले आहे.

काय म्हणाले नाना?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. आता भाजपचे नेते या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाय. आम्ही फक्त मोदींनी माफी मागावी इतकेच म्हणतोय. दुसरीकडे प्रसाद लाडांसारखे अण्णा हजारांच्या वक्तव्याचा आधार घेत आहेत. मात्र, आम्ही अण्णा हजारेंवर काहीच बोलायचं नाही, असं ठरवल्याचे ते म्हणाले.

आईवर शंका घ्यायलाही…

नाना पटोले म्हणाले की, प्रसाद लाड तुम्ही काल जे बोललात, ते सगळ्या महाराष्ट्राने ऐकले आहे. त्यामुळे तुमचे विचार काय, हे महाराष्ट्रात कळून चुकले आहे. आता आम्ही अण्णा हजारे साहेबांबाबत एकही शब्द बोलणार नाही. एखाद्या आईवर शंका घ्यायलाही हे लोक मागेपुढे पाहणार नाहीत. आता काहीही होवो. मोदींनी माफी मागितल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही. आम्ही आंदोलनाचा आव आणत नाही आहोत. देश विकणारे सरकार दिल्लीत बसले आहेत. त्या सरकारला आमचा आवाज गेला पाहिजे. महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.