AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार तेव्हा कोंबडी..’, नारायण राणेंनी हॉटेल चालकांना काय सांगितलं?

भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याचा उल्लेख करत राणेंनी निशाणा साधला.

'उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात येणार तेव्हा कोंबडी..', नारायण राणेंनी हॉटेल चालकांना काय सांगितलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2025 | 6:36 PM
Share

भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, त्यामुळेच ते उद्धव ठाकरे आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवायचे नाहीत, असं मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी चिपी विमानतळावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. चिपीला आता इंडिगो विमान पण येणार आहेत, आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढावेत यासाठी माझा प्रयत्न असल्याचंही  खासदार नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिशा सालियन प्रकरणात देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या प्रकरणात मला उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आल्याचा दावा राणे यांनी केला होता, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून राणेंचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. राणेंना जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आला होता, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.