AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Corona | कोरोना रुग्णसंख्या कमी, मृत्यू थांबले, पण निर्बंधाचा फास कधी होणार सैल?

नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत.

Nashik Corona | कोरोना रुग्णसंख्या कमी, मृत्यू थांबले, पण निर्बंधाचा फास कधी होणार सैल?
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Updated on: Mar 09, 2022 | 7:05 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटांनी हाहाकार माजवला. ऑक्सिजनसाठी लोक रस्त्यावर रांगेत उभे राहिले. कित्येकांनी तडफडून प्राण सोडले. मात्र, सध्या कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे. तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. मृत्यू थांबले आहेत, पण जिल्ह्यातील कोरोना (Corona) निर्बंध कायम आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्यापासून ते राजकीय कार्यक्रमही अवघ्या पन्नास टक्के उपस्थितीत पार पाडावे लागत आहेत. हे निर्बंध लागू राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नागरिकांनी लसीकरणाकडे (Vaccination) फिरवलेली पाठ आहे. हे लसीकरण कधी वाढणार, त्यासाठी प्रशासन काही सक्तीची पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

नेमके प्रकरण काय?

राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण 90 टक्के आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 70 टक्के आहे, त्या जिल्ह्यांचे निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. त्यानुसार राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, भंडारा, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे येथील निर्बंध कधी सैल होणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

नाशिकचे लसीकरण किती?

2011 च्या जनगणेनुसार कोरोना लसीकरण लाभार्थ्यांची संख्या ही साडेचौदा लाख आहे. त्यापैकी 13 लाख 55 हजार 668 लोकांनी पहिला डोस घेतलाय. तर यापैकी 10 लाख 32 हजार 162 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. नाशिक महापालिका हद्दीचा विचार केला, तर पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ही 93 टक्के आणि दुसरा डोस घेतलेल्या व्यक्तींची संख्या ही 71 टक्के आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे निर्बंध अजूनही कायम आहेत.

मृत्यू थांबले, रुग्ण घटले

नाशिक जिल्ह्यात सुरू असलेले कोरोना मृत्यूचे सत्र सध्या थांबले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात 4 हजार 304 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 105, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील रुग्णही घटले आहेत. सध्या 216 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये 97.50 टक्के, नाशिक शहरात 98.46 टक्के, मालेगावमध्ये 97.34 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 98.43 टक्के तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 98.08 इतके आहे.

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.