AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar | उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? शरद पवार काय म्हणाले?

Sharad Pawar On Raj And Uddhav Thackeray Nashik | राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ठाकरे बंधूंनी एकत्र यावं,अशी इच्छा राज्यातील जनतेकडून बोलून दाखवली जात आहे. आता शरद पवार यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar | उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांनी एकत्र यायला हवं का? शरद पवार काय म्हणाले?
| Updated on: Jul 08, 2023 | 4:09 PM
Share

नाशिक | महाराष्ट्रात वर्षभरात 2 राजकीय भूकपं झाले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत मोठा गट आपल्यासोबत नेला. शिंदेंच्या या बंडामुळे राज्यातील मविआचं सरकार गेलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत जात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सरकारला एक वर्ष झालं तितक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी बंड पुकारलं. अजित पवार यांच्यासह अनेक नेते सत्तेत सामील झाले. राज्यातील या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी इच्छा बोलून दाखवली जात आहे.

मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात 6 जुलै रोजी यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर पानसे शिवतिर्थावर आणि राऊत मातोश्रीवर गेले. या राऊत-पानसे भेटीमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली.

दरम्यान आता शरद पवार यांनी या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याबाबत आपलं मत मांडलं आहे. ठाकरे बंधू एकत्र यावं असं वाटतं का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर पवारांनी अवघ्या 5 शब्दात उत्तर दिलं.

शरद पवार काय म्हणाले?

“उद्धव ठाकरे-राज ठाकरे दोघे एकत्र आले तर आनंद आहे”, असं उत्तर पवारांनी दिलं. पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे उत्तर दिलं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा पवारांचे निष्ठावंत राहिलेल्या छगन भुजबळ यांच्या नाशकात आहे.

छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार

छगन भुजबळ यांनी 1991 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला. भुजबळ यांनी त्यानंतर 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून भुजबळ हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू होते. भुजबळांची ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा अशी ओळख होती. मात्र शरद पवारांची अजित पवार आणि अनेक राष्ट्रवादी आमदारांनी गेल्या रविवारी 2 जुलै रोजी साथ सोडली. दादांनी उपमुख्यमंत्री तर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर सर्वेसर्वा शरद पवार एक्टीव्ह मोडमध्ये आले. बंडानंतर लोकांमध्ये जाणार असल्याचा निर्णय घेत त्यांनी महाराष्ट्र दोऱ्याची घोषणा केली. या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिली सभा ही भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात नाशिक जिल्ह्यातील येवळ्यात होणार आहे. आता या सभेत पवार काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.