AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं, महाजनांनी सांगितला पुन्हा पालिका जिंकण्याचा प्लॅन

नाशिक महापालिकेचा गड राखण्याची जबाबदारी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahjan) यांना देण्यात आली आहे. आज गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाखल होत. आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं, महाजनांनी सांगितला पुन्हा पालिका जिंकण्याचा प्लॅन
गिरीश महाजन नाशिकचे प्रभारीImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 5:27 PM
Share

नाशिक : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे जोरदार वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. भाजपने (Bjp) तर निवडणुकांचे प्रभारीही जाहीर केले आहे. नाशिक महापालिकेचा गड राखण्याची जबाबदारी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahjan) यांना देण्यात आली आहे. आज गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाखल होत. आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेय. मेपर्यंत राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य महाजन यांनी केली आहे. तर पाच वर्षात केलेली कामं पाहून जनता भाजपला पु्न्हा निवडूण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.

नाशिकमध्ये लढत रंगत होणार

फक्त महाजनच नाही तर इतरही भाजपचे नेते नाशिकमध्ये जोर लावत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही नाशिकचे अनेक दौरे केले आहेत. तर राज ठाकरे अनेकदा नाशिकमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मनसे गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत आहे. नाशिकमध्ये मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर शिवसेनेकडून संजय राऊत यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे ही लढत रंगत होणार आहे.तर राष्ट्रवादीकडून पालकमंत्री छगन भुजबळ भाजपवर तोफा डागत आहेत. फक्त नाशिकच नाही तर मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातल्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नेते आता जोमाने मैदानात उतरले आहेत.

समीर भुजबळ काय म्हणाले?

नाशिक शहर व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी विविध विकासाची कामे आपण केलेली आहे. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा कारण ज्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची भाषा केली. त्यांनी नाशिकसाठी कुठली विकासाची कामे केली हा प्रश्नच असून नाशिककरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. याविषयीची सत्यता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घरातघरात जाऊन जनजागृती करावी असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

मेट्रो कारशेडची नवी जागा लवकरच घोषित करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, वाद संपणार?

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

‘यशवंत जाधवांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं, 100 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग!’, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.