AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाच्या शिधाला उशीर का? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण

त्यामुळे नेत्यांचे फोटो कदाचित गंभीर असतील.

आनंदाच्या शिधाला उशीर का? बाळासाहेब थोरातांनी सांगितलं कारण
बाळासाहेब थोरात म्हणतात...Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 19, 2022 | 7:20 PM
Share

नाशिक : राज्य सरकारनं आनंदाची शिधा शंभर रुपयांत देण्याची घोषणा केली. काही ठिकाणी आनंदाची शिधा पोहचली. पण, काही ठिकाणी अद्याप आनंदाची शिधा पोहचली नाही. याला उशीर का होतोय, यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, 100 रुपये किलो देणारे किटवर नेत्यांचे फोटो चांगले छापले नाहीत म्हणून उशीर होत आहे. गंभीर असलेले नेत्यांचे फोटो किटवर लावण्यात आले होते. त्यामुळं आता किमान दिवाळीनंतर नागरिकांना किट मिळेल, अशी अपेक्षा करूया, असंही ते म्हणाले. सरकार सध्या टेंशनमध्येच आहे. त्यामुळे नेत्यांचे फोटो कदाचित गंभीर असतील. हे काय वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अंतर्गत अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. गेल्या 50 वर्षापासून ते संसदीय कामकाजात आहेत. केंद्रीय मंत्री आणि विरोधीपक्ष नेते म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. एक अनुभवी नेता काँग्रेस पक्षाला अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मतदानामध्ये गडबड झाली आहे असे जे आरोप होत आहेत ते चुकीचे आहेत. अत्यंत खुल्या वातावरणात मतदान झाले आहे. सोनिया गांधी यांनी अतिशय कठीण काळात काम केले आहे. आता देखील काळ कठीण आहे. मात्र खरगे यांच्यावर काम करतील, असा विश्वास आहे.

राहुल गांधी हेदेखील सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत. सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन राहील. मात्र काम अध्यक्षांना करावे लागणार आहे. खरगे साहेब उत्तम मराठी बोलतात. आपल्यासाठी ते चांगलं आहे. येणारा 2024 वर्ष आमच्यासाठी खूप यश देणारे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला होणे हे दुर्दैवी घटना आहे. घरावर हल्ला करणं हे लोकांना रुचणार नाही. मागच्या काही दिवसापासून जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला रूचणारं नाही.

सध्या तरी पाणीटंचाई नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी परिस्थिती आहे. सगळे पीक खराब झाले आहेत. तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावे ही आमची मागणी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हंटलं.

शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी खूप खराब जात आहे. अजून पंचनामे नाही तर भरपाई कुठून देणार आहेत. फक्त घोषणा करून चालणार नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.