AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या टोरेस घोटाळ्यानंतर आता नवी मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लुटले

आता नवी मुंबईतील एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने देखील मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लाखो नवी मुंबईकरांना चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

मुंबईच्या टोरेस घोटाळ्यानंतर आता नवी मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लुटले
Navi mumbai scam
| Updated on: Jan 13, 2025 | 9:28 AM
Share

मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने लाखो मुंबईकरांना गंडवले आहे. टोरेस कंपनीच्या फसवणुकीप्रकरणी चौकशी सुरु आहे. मुंबईत इतका मोठा घोटाळा समोर आलेला असताना आता नवी मुंबईत आणखी एक आर्थिक घोटाळा समोर आला आहे. नवी मुंबईतील एका ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने मोठ्या परताव्याचे अमिष दाखवून लाखो नवी मुंबईकरांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंपनीविरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबईतील टोरेस कंपनीने केलेल्या आर्थिक घोटाळ्याने मुंबईकरांना मोठा धक्का दिला होता. कारण या घोटाळ्यात मुंबईकरांचे कोट्यावधी रुपये गुंतले आहेत. या घोटाळ्याची चर्चा सुरू असताना मुंबई नवी मुंबईतील आणखी एका कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची घटना समोर आली आहे. ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर असे फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख यांच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

कंपनीकडून मोठ्या परताव्याचे आश्वासन

मोहम्मद शेख हे मूळचे मुंबई अंधेरी शहरातील रहिवाशी आहे. शेख यांनी अंधेरीत असलेल्या ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीत जवळपास १४ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूक करताना शेख यांना कंपनीने मोठ्या परताव्याचे आश्वासन दिले होते. महिन्याला गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर १५ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूक केल्यानंतर शेख यांना दोन ते तीन महिने परतावा देखील मिळाला.

मात्र परतावा मिळणे बंद झाल्यानंतर शेख यांनी अंधेरी येथील कंपनीच्या ऑफिसला भेट दिली. मात्र कंपनीकडून उत्तर मिळत नसल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यालय नवे मुंबईत असल्याने त्या कार्यालयात जाण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानुसार शेख हे खारघर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात गेले. तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या उत्तरांमुळे शेख यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट स्थानिक पोलीस स्टेशन गाठून, कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली.

कंपनीचे मालक विनय कांबळेंना अटक

मोहम्मद शेख यांच्या तक्रारीनंतर खारघर पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली आहे. हा गुन्हा मुंबई अंधेरी एम आय डी सी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. हा गुन्हा एम आय डी सी पोलिसांकडे गेल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासला सुरुवात केली आहे. यानंतर मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस खारघर यांनी शुक्रवारी संयुक्त कारवाई करत या कंपनीचे मालक विनय कांबळे यांना ताब्यात घेतले आहे. सध्या विनय कांबळे हे मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास मुंबई पोलीस करत आहे.

खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खारघर पोलिसांनी हा गुन्हा अंधेरी एम आय डी सी पोलिसांकडे वर्ग केला आहे. एम.आय.डी.सी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर, मुंबई पोलीस आणि खारघर पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करून कंपनीच्या मूळ मालक विनय कांबळे याला अटक केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.