AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईसह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद राहणार आहेत. | Bharat Bandh

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर
| Edited By: | Updated on: Dec 08, 2020 | 10:50 AM
Share

नवी मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) वणवा आता देशभरात पसरला आहे. या पार्श्वभूमवीर मंगळवारी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्याप्रमाणावर पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. (Bharat Bandh for Farmers protest)

त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. येथील माथाडी कामगारांनीही उद्या काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईसह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये राज्यभरातून भाजीपाला आणि धान्याच्या गाड्या येतात. त्यानंतर याच बाजारपेठेतून मुंबई आणि लगतच्या परिसरात भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा होतो. मात्र, शुक्रवारी ही बाजारपेठ बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि इतर गोष्टींची आवकही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला आणि इतर आवश्यक गोष्टींचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हा बंद पाळा, संजय राऊतांचं आवाहन

भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केला आहे. हा बंद फार वेगळा आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली.

हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा, असे आवाहन संजय राऊत यांनी नागरिकांना केले.

उद्या राज्यभरात चक्का जाम; दूध-फळ आणि भाज्या मिळणार नाहीत

भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रातही चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. पण विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही. परंतु, उर्वरित व्यवहार आणि वाहतूक उद्या ठप्प असेल.

देशव्यापी आंदोलनासाठी हाक

कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!

FARMER PROTEST | भाजपचा अजून एक मित्रपक्ष NDAतून बाहेर पडणार? 8 डिसेंबरनंतर निर्णय!

(Bharat Bandh for Farmers protest)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.