Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ भागात आज, उद्या पाणीपुरवठा बंद

Navi Mumbai Water Cut News : नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय.

Navi Mumbai: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात आज, उद्या पाणीपुरवठा बंद
(प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:01 AM

नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी (Navi Mumbai News) आहे. खारघर, उलवे तसंच जेएनपीटी (JNPT) परिसरात दोन दिवस पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय. दोन दिवस खारघर, उलवे आणि जेएनपीटी परिसरात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं सांगण्यात आलंय. 3 जून (आज) आणि 4 जून (उद्या) असा सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणर आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय.

म्हणून पाणी पुरवठा बंद

जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व कामांसाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याचं आव्हान सध्या प्रशासनासमोर आलं. त्यामुळे तातडीनं हे काम पूर्ण करण्यासाठी उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी देखील तशीच परिस्थिती

याआधी 24 मे रोजी नवी मुंबई बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.दरम्यान, पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यानं नागरिकांना आताच पर्यायी व्यवस्था करुन पाण्याचा जपून वापर करावा, असं सांगण्यात आलंय. तर पालिकेकडून केल्या जाणाऱ्या दुरुस्तीच्या कामाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलंय.

खारघर, कळंबोली, पनवेल या भागाला हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. वेगवेगळ्या जलवाहिन्यांद्वारे पालिका क्षेत्रात रहिवाशांना पाणी पुरवठा केला जातो. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

पाणी जपून वापरा

3 जून आणि 4 जून असा सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे लोकांनी पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन करण्यात आलंय. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन पालिका प्रशासनकडून नवी मुंबईकरांना केलं जातंय. दोन दिवस खारघर, उलवे आणि जेएनपीटी परिसरात पाणी पुरवठा बंद राहिलं, असं सांगण्यात आलंय.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....