AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघरमध्ये वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं, पालकांच्या आंदोलनानंतर शाळेची माघार

अखेर 8 तास पालकांच्या ठिक्या आंदोलनानंतर खारघरच्या विश्वजीत इंटरनॅशनल स्कुलने पालकांसमोर माघार घेतलीय.

खारघरमध्ये वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं, पालकांच्या आंदोलनानंतर शाळेची माघार
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 9:35 PM
Share

नवी मुंबई : वाढीव फी न भरल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले पाठवणाऱ्या शाळेविरोधात खारघरमध्ये पालकांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर 8 तास पालकांच्या ठिक्या आंदोलनानंतर खारघरच्या विश्वजीत इंटरनॅशनल स्कुलने पालकांसमोर माघार घेतलीय. शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे दाखले मागे घेतलेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी सकाळी 10 वाजल्यापासून खारघरच्या विश्वज्योत इंटरनॅशनल स्कूलसमोर आंदोलन केलं होतं. विशेष म्हणजे युवासेना आणि मनसे विद्यार्थी सेनेने राजकारण दूर ठेवत पालकांना पाठिंबा दिला. त्यामुळेच राजकीय दबावानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट मागे घेतले (Parents protest against School action for fee in Kharghar Navi Mumbai).

मागील 1 महिन्यापासून खारघरच्या या शाळेच्या वाढीव फी संदर्भात पालक आणि शाळा यामध्ये वाद सुरू होता. फी न भरल्यानं शाळेनं विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले दिले होते. यानंतर पालकांनी खारघरच्या विश्वज्योत शाळेत ठिय्या आंदोलन केलं. दाखले मागे घेण्यासाठी पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे दाखले पाठवल्याविरोधात पालकांनी आंदोलन केलं. तसेच जोपर्यंत दाखले परत घेत नाही, तोपर्यंत शाळेतून हलणार नाही, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, दिवसभरात शाळेतील प्रशासन आणि पालक यांच्यात शाब्दिक चकमकही झालेली पाहायला मिळाली. या शाळेने 27 विद्यार्थ्यांना थेट मेलद्वारे शाळा सोडल्याचा दाखला पाठवला होता.

नेमकं काय घडलं?

लॉकडाऊन काळात शाळेमार्फत ऑनलाईन शिक्षण सुरु असताना वाढीव फी भरण्यास पालकांनी नकार दिला होता. युवासेनेच्या रुपेश पाटील यांनी याबाबत वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रारही केली. त्यांनतर वर्षा गायकवाड यांनी शाळेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही शाळेने बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांचे दाखले पालकांना पाठवले. तसेच पालकांनी मागणी करुनही हे दाखले मागे घेतले नाही.

खारघरच्या विश्वज्योत शाळेनं शालेय शुल्क भरले नाही म्हणून 27 विद्यार्थ्यांचे दाखले हे मेलद्वारे दिले होते. त्यानंतर पालक आक्रमक झाले. शाळेच्या आवारामध्ये पालकांनी गर्दी केली. जोपर्यंत आम्हाला देण्यात आलेले दाखले शाळा प्रशासन परत घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला.

विभागीय शिक्षण उपसंचालकांचेकडून विश्व ज्योत शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवण्यात आलं होतं. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास मान्यता रद्द करु, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा

कोरोना काळात महाविद्यालयीन फी कमी करा, 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या तक्रारींसह युक्रांदची मागणी

शाळा व्यवस्थापन आणि पालक संघटनांमध्ये संघर्ष का होतोय? राज्य शासनाची भूमिका काय?

व्हिडीओ पाहा :

Parents protest against School action for fee in Kharghar Navi Mumbai

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.