AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय तर म्हणे मुंबई आमची आहे, त्यांच्या काकांनी ठेवलंय मुंबई ह्यांची आहे; अजित पवार यांनी सुनावलं

तरीही कर्नाटकचे मंत्री, मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करतात. हेही सभागृहात लक्षात आणून दिल्याचं काम केलं.

काय तर म्हणे मुंबई आमची आहे, त्यांच्या काकांनी ठेवलंय मुंबई ह्यांची आहे; अजित पवार यांनी सुनावलं
अजित पवार
| Edited By: | Updated on: Jan 08, 2023 | 9:45 PM
Share

कोल्हापूर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्न हा ज्वलंत आहे. यासाठी अनेकांनी जीवाची पर्वा केली नाही. कारवार, बेळगाव आणि ८५६ गावं मराठी भाषिकांची आहेत. मराठी भाषिक गावं महाराष्ट्र राज्यात आली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं नंबर एकचे वकील लावावेत. हरीश साळवे यांच्याकडं हे प्रकरण द्या. वाहनं कर्नाटकात गेल्यानंतर तोडफोड करायची. वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं. आम्हालाही भावना आहेत. असं मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात ते बोलत होते.

एक इंज जागा देणार नाही, असं म्हणणारे तु्म्ही कोण. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यावर तुम्ही काय करणार. सगळे जण झटलो. देशातल्या लोकांना कोणत्याही राज्यात जाण्याचा अधिकार आहे.

कर्नाटकी म्हणतात मुंबई आमची आहे. यांच्या काकांनी ठेवली मुंबई. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. त्यासाठी १०६ लोकांनी हुतात्मे पत्करले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले. कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई हेही भेटीत उपस्थित होते. काही होणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. तरीही कर्नाटकचे मंत्री, मुख्यमंत्री बेताल वक्तव्य करतात. हेही सभागृहात लक्षात आणून दिल्याचं काम केलं.

गेल्या तीन पिढ्यांपासून आपण ही मागणी करत आहोत. ते जोपर्यंत आपल्यात येत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषिकांच्या पाठीशी उभा आहे. विधिमंडळाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राला सांगितलं आहे. त्यासाठी ठराव करण्यात आला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

महाराष्ट्र-कर्नाटक वाद काही थांबायचं नाव घेत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यावर तोडगा निघेल. तोपर्यंत दोन्ही राज्यातील नेते आपआपल्या सोयीनुसार बोलताना दिसून येत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.