AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Flood : चारवेळा पुराच्या पाण्याखाली आली पिके, चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळ्याच्या शेतकऱ्याची आत्महत्या, आठवड्याभरात तिसऱ्या पूरग्रस्ताचा बळी

शेकडो शेतकऱ्यांचं या पुरात नुकसान झालं. पेरलं ते उगवलं. पण, पुरानं निस्तनाबूत केलं. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकरी पार खचून गेला.

Chandrapur Flood : चारवेळा पुराच्या पाण्याखाली आली पिके, चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळ्याच्या शेतकऱ्याची आत्महत्या, आठवड्याभरात तिसऱ्या पूरग्रस्ताचा बळी
रवींद्र मोंढे, अमित मोरे, प्रफुल्ल भोयर, Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 27, 2022 | 7:51 PM
Share

चंद्रपूर : कधी नव्हे तो यंदा पुराने चंद्रपूरवासीयांना त्रस्त केले. कित्तेक दिवस पुराखाली पिके आलीत. कापूस, सोयाबीनचं होत्याचं नव्हतं झालं. जिल्ह्यात पुराने खचलेल्या शेतकऱ्यांचं मृत्यूला कवटाळण्याचं सत्र सुरूच आहे. चुनाळा येथील तरुण शेतकऱ्यानं (Farmer at Chunala) आत्महत्या केली. या आठवठ्यात चंद्रपूर जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची तिसरी आत्महत्या आहे. रवींद्र नारायण मोंढे (Ravindra Mondhe) (वय 45) याने आज दुपारी आपल्या राहते घरी गळफास लावला. सतत चारदा पाण्याखाली शेतपिक आले. घरचा कर्ताच गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सेवा सहकारी संस्थेतून (Seva Co-operative Society) शेतीकरिता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल केली होती. त्यातून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती.

वर्षभरापूर्व वडील गेले आता अमित

चंद्रपूर जिल्ह्यात अमित मोरे नामक 22 वर्षीय युवा शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन शेतातच आत्महत्या केली. ताज्या पुराच्या संकटाने संपूर्ण शेतीच खरवडून गेल्याने खचलेल्या शेतकऱ्याने जीवन संपविले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातील कवीठपेठ स्वतःच्या शेतात त्याने दहा एकर शेतीमध्ये सोयाबीन- मिरची व कापूस पिकाची लागवड केली होती. कर्ज व बुडीत शेतीमुळे वडिलांनी देखील वर्ष आधी आत्महत्या केली होती. मात्र अमितने निराश न होता मोठ्या भावाच्या मदतीने शेती करून कुटुंबाला हातभार लावला होता. मात्र ताज्या पुराच्या संकटाने दोन लाख रुपये कर्ज असलेला हा शेतकरी खचला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आठवड्याभरातील तिसरी आत्महत्या

शेकडो शेतकऱ्यांचं या पुरात नुकसान झालं. पेरलं ते उगवलं. पण, पुरानं निस्तनाबूत केलं. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकरी पार खचून गेला. 25 जुलै रोजी वरोरा तालुक्यातील मुरदगाव येथे प्रफुल्ल भोयर (35) या तरुण शेतकऱ्यांने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. तर 23 जुलै रोजी राजुरा तालुक्यातील कविठपेठ येथे अमित मोरे (22) या तरुण शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. या दोन जणांच्या आत्महत्येच्या घटना ताज्या असताना आता तिसरा शेतकरी हे जग सोडून गेला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.