AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

कितीही वेली एकत्र आल्यात तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. उद्धव ठाकरे यांनी डायलॉगबाजी बंद करावी, असंही ते म्हणाले.

कितीही वेली एकत्र आल्या तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
| Updated on: Jun 18, 2023 | 9:24 PM
Share

विवेक गावंडे, प्रतिनिधी, अकोला : उद्धव ठाकरे यांनी वरळीतील मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली. मणीपूर पेटत असताना तुम्ही तिथं जाऊन ते शांत करावं, असं आवाहन केलं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुम्ही मुकाबला करू शकत नाही. पाटण्यात मोदींना हरवण्यासाठी विरोधक एकत्र झालेत. त्यात आता उद्धव ठाकरे हेही पाटण्याला जाणार आहेत. कितीही वेली एकत्र आल्यात तरी वटवृक्षाला हरवू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं. उद्धव ठाकरे यांनी डायलॉगबाजी बंद करावी, असंही ते म्हणाले.

घरी बसणाऱ्यांना अमित शाह काय माहीत?

तुम्ही अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुकाबला करू शकत नाही. जे घरी बसतात त्यांना अमित शाह काय माहिती. जे घरात बसून राजकारण करतात. त्यांना नरेंद्र मोदी काय माहिती. पंतप्रधान मोदी यांनी या देशात गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हटलं

उद्धव ठाकरे यांचे सरकार घरी बसणार सरकार होतं. हे मी म्हणत नाही तर शरद पवार साहेबांनी नुकतंच आत्मचरित्र लिहिलं. ते असं म्हणाले आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षांमध्ये केवळ दोनच दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आमचे नुकसान झालं. आता मी म्हटलं असतं गेले नाही तर म्हणाले असते बघा आमचा विरोध करतात. पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय. उद्धव ठाकरेंची राजकीय समझ थोडी कमी आहे. म्हणून 40 लोक निघून गेले, तरी त्यांना समजलं नाही. हे मी नाही म्हटलं हे शरद पवार साहेबांनी या ठिकाणी म्हटलं आहे.

हा काही योगायोग नाही

देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार जनसामान्यांकरिता काम करते. पण काही लोकं यासाठी अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. कोल्हापुरातील घटना हा योगायोग नाही. हा एक प्रयोग आहे. काही लोकं प्रयोग करून या ठिकाणी अशांतता झाली पाहिजे, असा प्रयत्न करताय. अचानकपणे काही लोक औरंगजेबाचा स्टेटस कसा ठेवायला लागले. अचानक औरंग्याच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

पश्चिम विदर्भ ओलीताखाली आणणार

अकोला येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तुम्हाला सांगतो हे आपले जिल्हे जे सातत्याने दुष्काळामध्ये जातात या जिल्ह्यांचं चित्र बदलण्यात येणार आहे. वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा देखील अनेक करून दाखवू. वाहून जाणारा पाणीसाठा या ठिकाणी आणून हा सगळा भाग ओलिताखाली आणून हिरवा गार करू. अशा प्रकारचा पश्चिम विदर्भ हा तयार करण्याचा या ठिकाणी निर्धार आपण केलाय. कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मत दिलं. त्यामुळे हे काम करण्याची संधी मिळाली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.