AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं झालं की, मंत्रिमंडळ विस्तार होतो, अब्दुल सत्तार यांनी सांगितलं

मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे.

असं झालं की, मंत्रिमंडळ विस्तार होतो, अब्दुल सत्तार यांनी सांगितलं
अब्दुल सत्तार यांनी सांगितलंImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 28, 2022 | 6:09 AM
Share

परभणी : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार यावर चर्चा होतेय. यासंदर्भात कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ज्या क्षणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोन येईल त्याच क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी चार वेळा मंत्री झालेलो आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन आला की मंत्रिमंडळ विस्तार होतो. अब्दुल सत्तार यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. अब्दुल सत्तार आज परभणीत होते. शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

या सरकारमध्ये सगळं वेल अँड गुड आहे. मोठा परिवार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या गोष्टी होत असतात. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सरकारला अजिबात धोका नाही. शिवाय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. पुढचे दोन वर्षे हेच मुख्यमंत्री राहतील. माझी तर इच्छा आहे की पुढेही हेच मुख्यमंत्री असावेत, असंही सत्तार म्हणाले.

शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसासाठी दैवत आहे. मला वैयक्तिक असं वाटते की शिवाजी महाराजांचा फोटो हा नोटांवर असला पाहिजे. माझ्या हातात हे जर राहिलं असतं तर मी लगेच ऑर्डर काढली असती, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

सचिन सावंत यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी करू नये. या छोट्या-मोठ्या गोष्टी चालत राहतात. मजाकमध्ये म्हणलेली गोष्ट आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांना मी वैयक्तिक पाहिलेला आहे. त्यांचं काम उत्तम आहे. काही लोकांना कामच राहिलं नाही. त्यामुळं ते अशा गोष्टी समोर आणतात.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी अब्दुल सत्तार यांचं मंत्रीपद काढून त्यांना बिन खात्याचे मंत्री करावं, असं म्हटलं. यावर अमोल काय एवढा मोठा नाही की आपण इतक्या लोकांत त्याची चर्चा करावी. कोणाला टीव्हीवर येण्यासाठी काही बोलावे लागते, त्याचाच हा एक भाग आहे. राहिला विषय अमोल याच्याबद्दल काय बोलायचं हे मला माहीत आहे. मात्र हे बोलणं उचित होणार नाही. नाहीतर मला कोणाचं काय करायचं हे चांगलं माहीत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.