AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, या वर्षी सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात झाला आहे.

नंदुरबारमध्ये राज्यातील सर्वात कमी पावसाची नोंद, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना 'हा' सल्ला
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 9:01 PM
Share

नंदूरबार: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत असते. मात्र, या वर्षी सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात झाला आहे. तर दुसरीकडे सहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली तर 15 जिल्ह्यात मुसळधार आणि 16 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल. मात्र ,नंदूरबार जिल्ह्यात यावेळेस ही पावसाने हुलकावणी दिल्याने फक्त 44 टक्के पाऊस झाला आहे.

या वर्षी मान्सून मध्ये बंगालच्या उपसागरात असमान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कमी जास्त पाऊस होत आहे.जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊसाचे प्रमाण कमी होते.जुलै च्या शेवटच्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात समाधान कारक पाऊस झाला. कोकणात अतिवृष्टी तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये मुसळधार पाऊस झाला. मात्र, उत्तर महाराष्ट्र पावसाचे प्रमाण कमी होते. त्यात नंदुरबार जिल्ह्यात आता पर्यंत राज्यातील सर्वात कमी पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे सचिन फड यांनी दिली आहे.

सूर्यफूल लावण्याचं आवाहन

जिल्ह्यात सरासरी पेक्षा 45 टक्के पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारा पिकाची लागवड करावी बाजरी सूर्यफूल तूर या पिकाची लागवड करावी असं हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असली तरी नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

आयएमडीकडून मान्सूनचा उर्वरित अंदाज जाहीर

भारतीय हवामान विभागाकडून यंदा प्रथमच पावसाळ्यात प्रत्येक महिन्यात हवामानाचा अंदाज जारी करण्यात येत आहे. हवामान विभागाचे मुख्य अधिकारी डॉ.महापात्रा यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठीचा हवामानाचा अंदाज जारी केला. पावसाळ्याच्या या कालावधीमध्ये मान्सूनचा पाऊस सरासरी इतका राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सन 2021 च्या मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संपूर्ण देशात पाऊस सरासरी इतका कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशभरात या काळात सरासरीच्या 95 ते 105 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महन्यात देशात सर्वत्र पाऊस पडेल असाही अंदाज आयएमडीच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast: आयएमडीकडून ऑगस्ट सप्टेंबरसाठी हवामानाचा अंदाज जारी, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार?

ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Maharashtra Rain Update Nandurbar recorded low rain in state farmers are waiting for heavy rainfall

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.