AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा

मविआ सरकारनं शब्द न पाळल्यामुळं त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा
सदाभाऊ खोत, रयत क्रांती संघटना
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 8:02 PM

सांगली: महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला होता की 31 जुलै च्या अगोदर आम्ही या राज्यातील MPSC च्या सर्व जागा भरू आणि रखडलेल्या नियुक्त्या सुद्धा दिल्या जातील. MPSC साठी जो आयोग आहे त्यावरील सदस्य सुद्धा आम्ही तातडीने त्यांचीही नियुक्ती करू असा शब्द सभागृहाला दिला होता. मात्र, मविआ सरकारनं शब्द न पाळल्यामुळं त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

खोट बोल पण रेटून बोल असा कारभार

एमपीएससी संदर्भात एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत. कारण हे सरकार खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

15 ऑगस्ट पर्यंत MPSC च्या परीक्षा जाहीर केल्या नाहीत व ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही व आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर 15 ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू. असा इशारा सदाभाऊ खोत यांनी या माध्यमातून सरकार दिला आहे.

निलेश राणे यांच्याकडून अजित पवारांवर टीकास्त्र

राज्य सरकार 31 जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) रिक्त सदस्य भरणार आहे, अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. मात्र 31 जुलै तारीख संपत आली असताना देखील राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही. त्यावर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून विधीमंडळात केलेल्या घोषणेचा विसर पडलाय का? असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षातील नेतेही आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते निलेश राणेंनी ट्विट करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Corona Report: महाराष्ट्रात कोरोना वाढतोय, अहमदनगर, सांगलीसह साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात हत्येचा थरार, भर दिवसा सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात गोळ्या

Sadabhau Khot slammed MVA and Ajit Pawar over delay in MPSC appointment

हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले
पाकिस्तानच्या 12 शहरांमध्ये भारताकडून 50 ड्रोन हल्ले.
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त
मोठी बातमी! भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी रडार सिस्टिम उद्धवस्त.
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन
पाकिस्तानच्या अनेक शहरांमध्ये वाजले सायरन.
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा
कंदहारचा बदला पूर्ण! जैशचा दहशतवादी रौफ अझरचा खात्मा.
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब
बॉम्बस्फोटांच्या मालिकांनी पाकिस्तान हादरलं! पाकच्या नौदल तळाजवळ बॉम्ब.
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?
ऑपरेशन सिंदूर अजून... मोदी सरकारचं मोठं वक्तव्य, आता पुढची पाऊलं काय?.
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट
पाकिस्तानात स्फोटांची मालिका; 10 शहरांमध्ये 12 बॉम्बस्फोट.