AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन वर्षांपूर्वी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला, वादळी वाऱ्याने होत्याचं नव्हतं झालं

वडिलांचे छत्र हरवल्यावर या दोन तरुण भावंडांनी बँकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. परंतु अचानक आलेल्या वादळी पावसाने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

तीन वर्षांपूर्वी शेतीपूरक व्यवसाय सुरू केला, वादळी वाऱ्याने होत्याचं नव्हतं झालं
| Edited By: | Updated on: May 01, 2023 | 9:20 PM
Share

अकोला : जिल्हात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिरसो येथील प्रतीक आणि आकाश राजेंद्र मेहरे या दोघा भावांनी शेतीसाठी पुरक व्यवसाय म्हणून तीन वर्षांपूर्वी लाखो रुपयांचे भांडवल उभारले. कुक्कुटपालन पालन व्यवसाय सुरू केला होता. या केंद्रात हजारो पक्षी वाढवून त्याची विक्री करायचे. परंतु रात्री मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आल्याने कुक्कुटपालन शेडला ऊन, वारा, पाऊस यापासून पक्ष्यांच्या रक्षणासाठी लावलेले प्लॅस्टिक पडदे वादळाने उडून गेले. पोल्ट्री फॉर्ममध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण पक्षी भिजले.

तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू

यात कोंबड्यांना बसण्यासाठी अंथरलेले कुटार आणि खाद्यही भिजले. रात्रभर प्रचंड वादळ आणि पाऊस सुरू झाला. भिजलेल्या तीन हजारांच्यावर कोंबड्यांचा थंडीने कुडकुडून मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक पक्षी असलेल्या पोल्ट्री फॉमधील 3 हजार कोंबड्याचा मृत्यू झाल्याने प्रतीक आणि आकाश मेहरे या दोन भावंडांचे 7 ते 8 आठ लाखांचे नुकसान झाले आहे.

शासनाकडून मदतीची मागणी

वडिलांचे छत्र हरवल्यावर या दोन तरुण भावंडानी बँकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता. परंतु अचानक आलेल्या वादळी पावसाने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. आम्ही दोघा भावंडांनी मोठ्या मेहनतीने कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभा केला होता. अवकाळी पावसाने आणि वादळाने हजारो पक्षी मृत्यूमुखी पडल्याने किमान 7 ते 8 लाखांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा प्रतीक मेहरे यांनी व्यक्त केली.

मेंढपाळांचे एक कोटींचे नुकसान

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात सोनाळा शिवारात सुमारे साडेपाचशे मेंढ्या मृत्युमुखी पडल्यात. यामुळे मेंढपाळ व्यावसायीकांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ जामनेर तालुक्यात मेंढ्या चराईसाठी आलेले होते.

काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपिटीमुळे एकापाठोपाठ एक अशा शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झालाय. यामुळे मेंढपाळ कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला होता. आज दुपारी महसूल विभागाचे अधिकारी यांच्यामार्फत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.