AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा…

महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो.

गावातील विहिरींचे पाणी क्षारयुक्त, गढूळ पाण्यासाठी नदीपात्रात उतरावे लागते तेव्हा...
| Edited By: | Updated on: Jul 26, 2023 | 9:08 PM
Share

चंद्रपूर : वैनगंगा नदीपात्रालगत अनेक गावं येतात. गोसे येथे धरणाचे पाणी अडवल्याने नदीच्या दोन्ही बाजूची पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाळ्यात हेच पुराचे पाणी जीवघेणे ठरते. काही गावांतील शेतकऱ्यांची जमीन बुडते. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. वैनगंगा नदीच्या काठावर टोक नावाचे एक गाव आहे. या गावातील पाणी क्षारयुक्त आहे. म्हणून महिला नदीचे पाणी पिण्यासाठी आणतात. सध्या नदीचे पाणी दूषित झाले आहे. ते गढूळ झालेले पाणी नदीतून काढण्यासाठी महिलांना कसरत करावी लागते.

chandrapur 2 n

तोल नदीपात्रात जाण्याचा धोका

टोक गावाशेजारून वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट नदी पात्रात उतरावे लागते. असे करताना जराही तोल गेला की थेट नदी पात्रात जाण्याचा धोका कायम असतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी करायचं काय ? हा प्रश्न गावकरी विचारत आहेत. ही विदारक स्थिती अद्यापही प्रशासनाला दिसलेली नाही. चंद्रपूर जिल्हातील पोंभुर्णा तालुक्याच्या शेवटचा टोकावर असलेलं लहानसे गाव टोक. गावात जेमतेम 30 कुटुंब. लोकसंख्या 200. सर्व परिवार केवट समाजाचे आहेत.

नदीपात्रातून आणावे लागते पिण्याचे पाणी

टोक गावातील लोकांकडे मोजकी शेतजमीन आणि मासेमारी हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष झाले. गावाची मुख्य समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. टोक गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी पात्रातील पाणी आणावे लागते.

नदीचे गढूळ पाणी प्यावे लागते

पिण्याच्या पाण्याची ही समस्या मार्गी लागावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे यांनी लावून धरली. सहा महिन्यांपूर्वी जल जीवन मिशन योजने अंतर्गत सोलर ड्युअल पम्प बसाविण्यात आले. मात्र या विहिरीचे पाणी क्षारयुक्त असल्याने पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. अशात ऐन पावसाळ्यात त्यांना नदी पात्रातून पिण्याचे पाणी त्यांना आणावे लागते. सध्या नदीला गढूळ पाणी आहे. या गढूळ पाण्यासाठी ही गावाकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.