AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhima Koregaon Case:चौकशी आयोगाकडून सुनावणी स्थगित, कामासाठी योग्य जागा नसल्याचं सरकारला पत्र

राज्यात कोविड-19 च्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, या दोन सदस्यीय आयोगाने सुमारे 14 महिन्यांनंतर या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुनावणी सुरू केली होती. आयोगाने 8 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या प्रस्तावित सुनावणीबाबत सरकारला माहिती दिली होती.

Bhima Koregaon Case:चौकशी आयोगाकडून सुनावणी स्थगित, कामासाठी योग्य जागा नसल्याचं सरकारला पत्र
koregaon bhima voilence
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 5:10 PM

मुंबईः भीमा-कोरेगाव दंगल प्रकरणी चौकशी आयोगाने सुनावणी स्थगित केली आहे. आयोगाने त्यांच्याकडे कामासाठी योग्य जागा नसल्याने सुनावणी स्थगित केल्याचं सांगीतलं आहे. सरकार मुंबईत कामासाठी योग्य जागा उपलब्ध करून दईप्रयंत आयोगाने भविष्यातील सर्व सुनावण्या स्थगित केल्या आहेत, असं आयोगाने आपल्या पत्रात म्हटले आहे. (panel suspends hearings in bhima koregaon case due to lack of working space office)

राज्यात कोविड-19 च्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर, या दोन सदस्यीय आयोगाने सुमारे 14 महिन्यांनंतर या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुनावणी सुरू केली होती. आयोगाने 8 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या प्रस्तावित सुनावणीबाबत सरकारला माहिती दिली होती.

आयोगाचं सरकारला पत्र

31 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्य सचिव आणि इतर अधिकार्‍यांना लिहलेल्या पत्रात आयोगाचे सचिव व्ही व्ही पालनीटकर म्हणाले की, आयोग सरकारला मुंबईत लवकरात लवकर योग्य जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करत आहे.

28 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत, आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी प्रधान सचिव, गृह, यांना हा मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे न्यावा आणि तातडीच्या आधारावर योग्य जागेची व्यवस्था करण्यास सांगितले. 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत कामासाठी योग्य जागा नाही मिळाली तर आयोग सुनावणीचे वेळापत्रक स्थगित करेल, असेही पत्रात म्हटले आहे. पण सरकार कडून कोणतेच उत्तर आले नाही.

सध्या काममाज मुंबईतील राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयाच्या परिसरातून चालू आहे. जागा लहान असल्याने, कोविड-19 नियमांचे पालन करणे कठीण होते, असे आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी सोमवारी, पीटीआयला सांगितले.

रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांना समन्स

भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 मध्ये हिंसा घडली होती, तर 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवारवाडा येथे एल्गार परिषद घेण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी आयोगामार्फत करण्यात येत आहे.

मागच्या सुनावणीत, चौकशी करण्यासाठी आयोगाकडून रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांना समन्स बजावण्यात आले होते. रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त असताना ही हिंसा घडली होती. यावेळी परमबीर सिंह कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना आयोगाने पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Other News

फरार घोषित होणं टाळण्यासाठी अनिल देशमुख ईडीसमोर प्रकटले’, चंद्रकांत पाटलांचा टोला

Maharashtra By-Election Results 2021 Date: देगलूरचा आमदार कोण? मतदारांचा कौल काँग्रेस की भाजपला, उद्या मतमोजणी

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुना, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

panel suspends hearings in bhima koregaon case due to lack of working space office

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.