AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का ? अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहेत का ? नितेश राणेंचा सवाल

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातातर वातावरण चांगलंच तापलं आहे. एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुण्यातीलच नव्हे देशभरातील नागरिकांनी व्यक्त करत दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का ? अग्रवाल कुटुंबाशी संबंध आहेत का ? नितेश राणेंचा सवाल
nitesh rane
| Updated on: May 23, 2024 | 12:32 PM
Share

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघातातर वातावरण चांगलंच तापलं आहे. एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत कार चालवून बाईकला धडक दिली आणि त्यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे पुण्यातीलच नव्हे देशभरातील नागरिकांनी व्यक्त करत दोषीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली पोळी भाजून घेतली असून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. पुण्यात एकीकडे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातही वाद रंगल्याचे दिसत असून धंगेकरांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले होते. मात्र आता भाजप नेते नितेश राणेंनी याप्रकरणात उडी घेत थेट राष्ट्रवादीच्या नेत्या, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का ?

नेहमी बोलणाऱ्या सु्प्रिया सुळे या पुणे अपघातावर गप्प का आहेत ? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. शरद पवार गटातून या घटनेवर प्रतिक्रिया का येत नाही ? सुप्रिया सुळे आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत का ? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला. पुण्यातील अपघाताच्या या प्रकरणावरून नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘ नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत ? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ? प्रत्येक गोष्टीवर, उठसूठ देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या पुण्याच्या घटनेवर मात्र गप्प का ? त्यांचे या घटनेतील कुटुंबाशी संबंध होते का ? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का ? कारण आरोपीला जो वकील देण्यात आला आहे, तो पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे समजते,’ असा आरोप नितेश राणे यांनी केला.

तरुण पिढी नारळपाणी पिण्यासाठी जाते का ?

दरम्यान या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेल्या वसंत मोरे यांनी मत नोंदवलं आहे. कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला, तो दुर्देवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते असं वसंत मोरे म्हणाले. नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या, त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे असंही त्यांनी नमूद केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.