AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर, नियम मोडताना दिसला की कारवाई!

अहमदनगरमध्येही कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील रस्त्यावर उतरले आहेत. | Ahmednagar Corona

नगरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रस्त्यावर, नियम मोडताना दिसला की कारवाई!
Nagar SP manoj patil And Collecter Rajendra jagtap
| Updated on: Mar 13, 2021 | 1:12 PM
Share

अहमदनगर : संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसून येत आहे. काही शहरात आणि ग्रामीण भागांत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. अशात अहमदनगरमध्येही कोरोना रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील रस्त्यावर उतरले आहेत. (Ahmednagar Corona positive Cases increasing Collecter And SP on Street)

नगर शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झालीये. आज 327 (शनिवारी) रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकाच दिवसात 509 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत चालल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि पोलोस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा उगारलाय.

नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आर्थिक दंड

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.

एसपी आणि कलेक्टर साहेबांची रस्त्यावर उतरुन जनजागृती

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.

सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

कापड बाजार, जिल्हापरिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियम मोडणाऱ्या नागरिकांवर आणि कर्मचाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली. ज्या दुकानात मास्क वापरले जाणार नाही ते दुकान महिनाभर सील करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.

लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक नाही

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करू नये. त्यासाठी पोलिसांची मंगल कार्यालयात गस्त असणार आहे. गर्दी आढळल्यास यापुढील काही दिवस मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशाराही देण्यात आलाय.

(Ahmednagar Corona positive Cases increasing Collecter And SP on Street)

हे ही वाचा :

पालघरच्या आश्रमशाळेत कोरोनाचा स्फोट, 48 विद्यार्थ्यांपाठोपाठ 19 कर्मचारीही बाधित

पुण्यात 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस द्या, अजितदादांची मोदी सरकारकडे मागणी

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.