AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi)आल्यापासून वीजेची समस्या राज्यात निर्माण झाली आहे. आधी समस्या निर्माण करायची आणि मग ती पुसायची हे महाविकास आघाडीचे काम आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

Pune Girish Mahajan : भाजपाकाळात एक दिवसही भारनियमन करावं लागलं नाही, वीजप्रश्नी गिरीष महाजनांची पुण्यात महाविकास आघाडीवर टीका
भाजपा नेते गिरीष महाजनImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 18, 2022 | 3:29 PM
Share

पुणे : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आल्यापासून वीजेची समस्या राज्यात निर्माण झाली आहे. आधी समस्या निर्माण करायची आणि मग ती पुसायची हे महाविकास आघाडीचे काम आहे, अशी टीका भाजपा नेते गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. वीजप्रश्नावरून त्यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, कधी कोळशाकडे बोट दाखवायचे तर कधी केंद्र सरकारकडे… कोळशाअभावी (Coal) कोणतेही वीजकेंद्र बंद नाही. 2 हजार मेगावॅटची वीजकेंद्रे आज बंद आहेत. वीजकेंद्र बंद ठेवण्यामागे दलालीचे काम आहे. चढ्या भावाने वीज खरेदी करून दलाली मिळवायची हे काम राज्य सरकारचे चालले आहे. मात्र केंद्र सरकारने आता बंधन घातले आहे. चढ्या भावाने कोळसा खरेदी करायचा आणि मग चढ्या भावाने विकायचा हा धंदा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘फक्त दलाली करण्याचे काम’

पुढे ते म्हणाले, की ग्रामीण भागात विजेची मोठी टंचाई आहे. उद्योजकांना उद्योग चालवणे कठीण झाले आहे. राज्य सरकारच्या अशा कामांमुळे सगळी जनता ही मेटाकुटीला आली आहे. खरिपाचा हंगाम गेला. अतिवृष्टी झाली सगळीकडे, पण वीज नसल्याने शेतकऱ्यांना काही पिकवता येत नाही. भाजपा होते तेव्हा एक दिवसही लोडशेडिंग करावे लागले नाही. टान्सफॉर्मरमुळे वीज एक दिवसही बंद नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे वीजमंत्री असताना वीजटंचाईला तोंड द्यावे लागले नाही. फक्त दलाली करण्याचे काम राज्य सरकारचे चालले असल्याचे ते म्हणाले.

‘सगळे मंत्रिमंडळ अकार्यक्षम’

ते म्हणाले, की आमची मागणी आहे, की काहीही करा मात्र वीज द्या. उन्हाळ्याचे दोन महिने आहेत. पाऊस लवकर पडणार नाही, त्यामुळे लोकांना वीज द्या अशी मागणी त्यांनी केली. नितीन राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की नितीन राऊतच नाही तर सगळे मंत्रिमंडळ अकार्यक्षम आहेत. मुख्यमंत्री तर आहेत की नाहीत हा प्रश्न आहे. दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री मंत्रालयाची पायरी चढले. इतर राज्यात कमी-जास्त असेलही. पण आपल्या राज्यासारखी परिस्थिती कुठे नाही.

‘तिघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला’

तिघांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. मुख्यमंत्री एक म्हणताय ,अजित दादा वेगळे म्हणतात. नितीन राऊत वेगळे म्हणतात. मात्र यांनी महाराष्ट्राची वाट लावली असल्याची टीका त्यांनी केली. 2 हजार मेगावॅटची केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने सांगितले आहे, की आम्ही कोळसा देऊ. मात्र जनतेची सहानुभूती मिळवण्याचे काम सुरू आहे, असे ते यावेळी म्हणाले.

आणखी वाचा :

Pune Chitra Wagh : रघुनाथ कुचिक प्रकरणी माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे, चित्रा वाघांचं पुणे पोलिसांना पत्र

Pune SDPI Vs Raj Thackeray : अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, ‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

Pimpri Chinchwad crime : आठ वर्षाच्या चिमुरड्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून! पिंपरी चिंचवडच्या चिखलीतली हृदयद्रावक घटना

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.