AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ujani Dam : मुसळधार पावसामुळे आता उजनी धरणही लवकरच भरणार, एकूण पाणीसाठा 106.36 टीएमसीवर!

11 जुलैच्या आसपास धरणातील पाणीसाठा उणे होता. त्यावेळी धरणात 60. 05 टीएमसी एवढा मृत पाणीसाठा होता तर धरण मायनस 6.73 टक्क्यांवर होते. मात्र पुणे जिल्ह्यातील धरण साखळीत मागील काही दिवसात मोठा पाऊस झाल्याने या भागातील धरणे भरली.

Ujani Dam : मुसळधार पावसामुळे आता उजनी धरणही लवकरच भरणार, एकूण पाणीसाठा 106.36 टीएमसीवर!
उजनी धरणImage Credit source: tv9
| Updated on: Aug 02, 2022 | 3:24 PM
Share

पुणे : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाची (Ujani Dam) पाणीपातळी वाढत आहे. सध्या पाणी पातळीच्या 80 टक्क्यांचा टप्पा ओलांडला गेला आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा 106.36 टीएमसी झाला आहे. अजूनही दौंडमधून तीन हजारपेक्षा जास्त क्युसेक (Cusec) विसर्गाने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे लवकरच उजनी शंभरी गाठेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी वर्गातूनदेखील समाधान व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या 11 तारखेला उजनी धरणाचा पाणीसाठा हा उणे होता. मात्र सोलापूरसह पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) धरणाची वाटचाल आता शंभर टक्क्यांकडे सुरू झाली आहे. उजनी धरणामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे कारखाने आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे एकूणच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या शुभवार्तेने शेतकरी आनंदून गेला आहे.

ऊसपीकास फायदा

उजनी धरणामुळे पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकांकडे त्यातही ऊसाच्या पीकाकडे वळला आहे. उजणीच्या क्षेत्रात यंदा सर्वाधिक ऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या पुणे-सोलापूरच्या या पट्ट्यात पाणीदेखीव टँकरने घेण्याची वेळ अनेकवेळा आली. यंदा मात्र सुखावणारा पाऊस आहे. तर धरणही शंभरीकडे (साठा) मार्गक्रमण करत आहे. यामुळे बागायतीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रब्बी पिकांना प्राधान्य देणारा शेतकरी खरीपाकडे वळला ते या धरणामुळे… त्यामुळे आता केवळ 20 टक्क्यांच्या आसपास धरण भरणे बाकी आहे.

अतिरिक्त पाणीसाठा सोडण्यात आला

जुलै महिन्याच्या सुरुवातीला साधारणपणे 11 जुलैच्या आसपास धरणातील पाणीसाठा उणे होता. त्यावेळी धरणात 60. 05 टीएमसी एवढा मृत पाणीसाठा होता तर धरण मायनस 6.73 टक्क्यांवर होते. मात्र पुणे जिल्ह्यातील धरण साखळीत मागील काही दिवसात मोठा पाऊस झाल्याने या भागातील धरणे भरली. त्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडण्यात आला. भीमा नदीच्या मार्फत हा पाणीसाठा वाहत उजनी धरणात येतो. याच कारणाने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तर पाऊसही अजून कमी झालेला असला तरी थांबलेला नाही. अधूनमधून तो बरसत असल्याने लवकरच धरण आता भरणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.