AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil | घराघरात जा…आरक्षण समजून सांगा…मनोज जरांगे पाटील यांनी दिली त्रिसूत्र

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे निघालेले वादळ आता पुणे जिल्ह्यात आले. मनोज जरांगे पाटील यांची राजगुरुनगरमध्ये सभा झाली. त्यासभेत त्यांनी मराठा समाजास आंदोलनाचे तीन सूत्र सांगितले.

Manoj Jarange Patil | घराघरात जा...आरक्षण समजून सांगा...मनोज जरांगे पाटील यांनी दिली त्रिसूत्र
Follow us
| Updated on: Oct 20, 2023 | 2:52 PM

पुणे | 20 ऑक्टोंबर 2023 : मराठ्यांना आरक्षण मिळाले तर जल्लोष होईल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, असा इशारा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून सरकाराला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तोफ पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये धडाडली. लाखो तरुणांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. या तरुणांच्या जीवन संपवण्यास फक्त सरकारच जबाबदार आहे. कारण सरकारने मराठा आरक्षण दिले असते तर त्या तरुणांना जीवन संपवावे लागले नसते.

आरक्षण समजून घेतले पाहिजे

मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे फिरणार नाही. सरकारकडून मराठा समाजावर अन्याय झाला आहे. आता राज्यातील मराठा एक झाला आहे. आपण आतापर्यंत मोर्चे खूप काढले. सभा घेतल्या. परंतु आरक्षण समजून घेतले नाही. घराघरातील समाजास आरक्षण समजून घेणे गरजेचे होते. ज्यांना आरक्षण समजले त्यांनीही मराठ्यांना ते शिकवले नाही. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतले, ते नक्कीच आरक्षणात गेले. आपण फक्त बोंबलोत बसलो.

तो जीआर का फेटाळला

टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला. आम्ही ४० दिवसांचा वेळ दिला. सरकारने मागितलेल्या पर्यायांवर हा वेळ दिला. त्यानंतर आणखी एक पर्याय दिला. सरकारचा १ जून २००४ रोजी जीआर आला आहे. त्यात मराठा आणि कुणबी एकच असल्याचा म्हटले आहे. त्या जीआरनुसार सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आम्ही केली. सरकारने नवीन जीआर काढला. त्यात असे म्हटले की, वंशवळीच्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आपण हा जीआर नाकारला.

हे सुद्धा वाचा

काय आहे त्रिसूत्र

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण आंदोलनाचा पुढील टप्पा सांगत तीन सूत्र सांगितले. उद्यापासून प्रत्येक घराघरात जा. मराठा समाजास आरक्षण समजून सांगा. एकत्र का यायचे ते सांगा… अन् तिसरे सूत्र म्हणजे एकाने आत्महत्या करायची नाही. उद्रेक करायचे नाही. जाळपोळ करायची नाही. मराठा समाजाच्या शांततेच्या आंदोलनाने त्यांना जेरीस आणले आहे. उद्रेक केल्यावर काय होते आपल्यावर गुन्हे दाखल होतात. त्यानंतर आपल्या तरुणांना नोकरी मिळत नाही. यामुळे शांततेचा मार्ग आपला आहे. सरकार २४ तारखेच्या आत मराठा समाजास आरक्षण देईल, अशी अपेक्षा मला आहे.

सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.