AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : राज्यात मान्सून कधी? हवामान विभागाने दिली माहिती, बिपरजॉयचा धोका कायम

Monsoon and cyclone : बिपोरजॉय चक्रीवादळाचा धोका १४ जूनपर्यंत काम राहणार आहे. मुंबई अन् कोकण किनारपट्टीवर बिपोरजॉय वादळाचे परिणाम दिसणार आहे. दुसरीकडे राज्यात मान्सून कधी दाखल होणार? याचे उत्तर भारतीय हवामान विभागाने दिले आहे.

Monsoon Update : राज्यात मान्सून कधी? हवामान विभागाने दिली माहिती, बिपरजॉयचा धोका कायम
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 9:02 AM

पुणे : मान्सूनने केरळमध्ये 8 जून रोजी हजेरी लावली आहे. त्यानंतर मान्सूनने आपली पुढील वाटचाल सुरु केली आहे. आता मान्सून कर्नाटकमध्ये दाखल झाला आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात आहे. १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील भागात पाऊस पडणार नाही. या वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. मात्र मुंबईला त्याचा धोका नाही. या वादळामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात कधी येणार मान्सून

हे सुद्धा वाचा

केरळमध्ये ८ जून रोजी दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात कधी येणार? याची वाट सर्वच जण पाहत आहेत. भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रगती पाहून राज्यात कधी येणार? याचे उत्तर दिले आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखीन 10 दिवसांची प्रतीक्षा असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करु नये, असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.

मान्सूनचे काय आहेत निकष

  • केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हवामान खात्याची 14 स्टेशन आहेत. 10 मे नंतर या स्थानकांवर सलग दोन दिवस किमान 2.5 मिमी पाऊस झाला, तर मान्सून दाखल झाल्याचे मानले जाते. ही 14 स्थानके आहेत- मिनिकॉय, अमिनी, तिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, कोची, त्रिशूर, कोझिकोड, थलासेरी, कन्नूर, केसरगोड आणि मंगळुरू.
  • वेस्टर्न डिस्टर्बन्समध्ये हवेचा दाब 600 हेक्टोपास्कल असावा. म्हणजे वारे कमी उंचीवरुन वाहायला हवेत. त्याची दिशा विषुववृत्ताच्या उत्तरेकडे हवी. ही वारे मान्सूनला भारताकडे खेचतात. मान्सूनला ढकलणारा वारा 5 ते 10 अंश उत्तर अक्षांश आणि 70-80 अंश रेखांश असावा. त्याचा वेग ताशी 28 ते 37 किलोमीटर असावा.
  • उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या डेटामध्ये ओएलआर मूल्य (पृथ्वीचा पृष्ठभाग, महासागर आणि वातावरणातून किती उष्णता सोडली जात आहे) 200 डब्ल्यू प्रति चौरस मीटरपेक्षा कमी असावा. त्याची दिशा 5 ते 10 असावी. ते उत्तरेकडे आणि 70 ते 75 अंश पूर्वेकडे असावे.

रत्नागिरीत पाऊस

रत्नागिरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. कोकणात मान्सून पूर्व पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. बिपरजॉय चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...