AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Police: आता गुन्हेगार सहज पकडेल जाणार; पोलिसांकडून गुन्हेगारांच्या शोधासाठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमचा वापर

यापूर्वी गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगारांच्या बोटाचे ठसे घेतेले जात होते. त्यावरून गुन्हेगाराचा शोध घेतला जात होता. त्याची ओळख पटवली जात होती. मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे.

Maharashtra Police: आता गुन्हेगार सहज पकडेल जाणार; पोलिसांकडून गुन्हेगारांच्या शोधासाठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमचा वापर
Image Credit source: twitter
| Updated on: May 15, 2022 | 2:40 PM
Share

पुणे – महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाबावर(Social Media)   सक्रिय होण्याबरोबरच गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आधुनिक पद्धतीने तपासास प्राधान्य देताना दिसून येत आहेत. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra  police)दलाने नुकतच गुन्हेगारांना शोधण्यासाठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम विकसित केली आहे. या पद्धतीद्वारे गुन्हेगारांचे (Criminals)बोटांचे ठसेच नाही तर आता तळवे, चेहरा आणि डोळे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधिरित ही सिस्टीम बनवण्यात आली आहे. याच्या मदतीने गुन्हांची तात्काळ उकल केली जाणार आहे.या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन गुन्हेगार पकडण्याच्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्‍वास गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांनी व्यक्त केला.

 बोटांच्या ठश्यांवरून होत होती उकल

यापूर्वी गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगारांच्या बोटाचे ठसे घेतेले जात होते. त्यावरून गुन्हेगाराचा शोध घेतला जात होता. त्याची ओळख पटवली जात होती. मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजिटल स्वरुपात जतन करुन ते पुराव्याशी जुळविण्याची क्षमता आहे.

पोलीस प्रशासनाला होणार मदत

ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम या संगणकीय प्रणालीचे उद्‌घाटन अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्‍चिम) सुरेश मेखला, पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे, रोहिदास कसार, अविनाश सरवीर, रुपाली गायकवाड यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.