Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार फायदा

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुंबईसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत आता जागतिक दर्जाची संस्था सुरु होणार आहे.

मोदी सरकारची महाराष्ट्राला मोठी भेट, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना होणार फायदा
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 15, 2023 | 3:16 PM

पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. मुंबईत आता जागतिक स्तरावरील दर्जेदार शैक्षणिक संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील निर्णय मोदी मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याची माहिती भाजप नेते अन् आमदार आशिष शेलार यांनी दिली. देशात 65 वर्षे काँग्रेस सरकार होते, परंतु मुंबईला काही मिळाले नाही, असा दावा शेलार यांनी केला आहे.

काय मिळाले मुंबईला

मुंबईला IIM म्हणजेच भारतीय व्यवस्थापन संस्था सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने या निर्णयास मान्यता दिली आहे. NITIE मुंबई ही देशातील २१ वी तर राज्यातील दुसरी आयआयएम असणार आहे. यापूर्वी राज्यात केवळ नागपूरसाठी आयआयएम होती. या निर्णयाबद्दल मुंबई भाजपकडून मोदी सरकारचे आभार मानले असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.

काय म्हणाले शेलार

पवईत असणाऱ्या NITIE कॉलेजला IIM ची परवानगी मिळाली आहे. जगात नामवंत असणारी आयआयएमच्या 350 जागा मुंबईत मंजूर झाल्या आहेत. त्याला कॅबिनेटने मान्यता दिली असून संसदेच्या येत्या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होईल. पण मुंबईमध्ये आयआयएम मिळाले तरी विरोधक गप्प का? या विषयावर ते बोलत का नाही? असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

शिक्षणात अनेक बदल

देशाच्या इतिहासात शिक्षण पॉलिसी बदलण्याचे धाडस मोदी सरकारने केली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश आहे. मोदी सरकारने शिक्षण धोरणात केलेले बदल विद्यार्थ्यांपर्यंत नेणार आहे. त्यासाठी भाजप प्रत्येक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. मुंबईला सगळे मिळत आहे, या सगळ्या योजना जनतेपर्यंत नेणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांना राजकीय कावीळ

ज्यांना कावीळ झाले आहे, त्यांना सगळ पिवळ दिसते. आदित्य ठाकरे यांना काही होऊ नये, परंतु त्यांना राजकिय कावीळ झाली आहे, हे खरे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना सगळे निर्णय विद्यार्थ्यांच्या विरोधात होत असल्याचे वाटतात.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.