AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम

आम्ही राजकीय मंडळीच कोरोनाला हलक्यात घेत आहोत, अशी कबुली कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली.

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत : मंत्री विश्वजीत कदम
विश्वजीत कदम
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 9:47 AM

सांगली :  महाविकास आघाडीमधील जवळपास 56 टक्के मंत्री कोरोनाने बाधित झाले आहेत तर आणखीही 4 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये ‘आमचे चुकतंय’ अशी  प्रांजळपणे कबुली दिली चावली आहे. (Political leaders Do not take Serius Corona Says Minister Vishwajeet Kadam)

दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावत नाही.. खरं तर ही आमची मोठी चूक आहे.. आणि ही चूक आम्ही केली नाही पाहिजे, अशी  कबुली विश्वजित कदम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील  खानापूर नगरपंचायत मधील 3 कोटी 82 लाख रुपयांच्या विकासकांमाचे उदघाटन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर विश्वजित कदम यांनी उत्तर दिलं.

सर्वसामान्यांना लस द्यायला आणखी वेळ लागेल

महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही भागांत तर लॉकडाऊन करण्याचा प्रशासन विचार  करत आहे.सध्या राज्यात जरी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सर्वसामान्य लोकांना लस देण्याच्या प्रक्रियेला अजून बराच वेळ लागणार आहे, असं विश्वजीत कदम म्हणाले.

कोरोनाविरोधी लढताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग ही आपली त्रिसूत्री

पुन्हा जरी कोरोना वाढतोय हे  चित्र खरे असले तरी राज्य सरकार कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांना लोकांची साथ हवी आहे. कोरोनाविरोधी लढताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझिंग ही आपली त्रिसूत्री असल्याचंही विश्वजीत कदम यांनी सांगितलं.

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ नाही

अधिवेशनाच्या तोंडावर कोरोनाचा बाऊ सरकार करतेय, असा आरोप हा चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्यावर बोलताना विरोधकांवी  केलेला आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे, असं विश्वजीत कदम म्हणाले.

अधिवेशन किती दिवस घ्यायचे याचा निर्णय समिती घेते

मागे कोरोनाच्या काळात जे अधिवेशन झाले त्यावेळी सर्व आमदारांना आणि त्याच्या खासगी कर्मचाऱ्यांना अधिवेशनाला येण्यापूर्वी  कोरोना टेस्ट करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.यात 288 पैकी 78 आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, अधिवेशन हे होणारच आहे पण अधिवेशनाचा कालावधी किती असावा ही समिती ठरवत असते. 25 तारखेच्या पुढे अधिवेशन किती दिवस घ्यायचे हा देखील निर्णय होईल, असंही ते म्हणाले.

(Political leaders Do not take Serius Corona Says Minister Vishwajeet Kadam)

हे ही वाचा :

Video : ‘देव करतो ते भल्यासाठीच करतो…’, ऐका धनंजय मुंडेंच्या तोंडून खास गोष्ट

‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.