AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची चिंता सुटली का? कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा

Pune News : पुणे जिल्ह्यात घाटमाथावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. पुणे शहरापेक्षा या ठिकाणी पाऊस चांगला झाला. या पावसामुळे पुणे शहराची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे का?

Pune News : पुणे शहराच्या पाणी प्रश्नाची चिंता सुटली का? कोणत्या धरणांमध्ये किती झाला जलसाठा
khadakwasla
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 12:22 PM

पुणे | 3 ऑगस्ट 2023 : राज्यात उशिराने आलेला मान्सून जुलै महिन्यात चांगलाच बरसला. या पावसामुळे कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी हाहा:कर उडाला होता. विदर्भात शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली होती. अनेक गावांना पुराने वेढले होते. पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला नसला तरी पुणे परिसरातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे धरण खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर यांची पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. यामुळे पुणे शहराची पाणी पुरवठ्याची चिंता मिटली आहे.

खडकवासलाची काय आहे परिस्थिती

खडकवासला धरणात ९८ टक्के जलसाठा झाला आहे. पाणशेत धरणात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. वरसगाव धरणात ७७ तर टेमघर धरणात ६० टक्के जलासाठा आहे. यामुळे पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याची चिंता आता राहणार नाही. पुणे शहरात पाणी कपातही आता होणार नाही.

निरा देधवर ९० टक्के भरले

पुण्याच्या भोर तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे निरा देवघर धरणं 90 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाच्या विदुयतगृहद्वारे 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडले जात आहे. धरणातून पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पाठबंधारे विभागाकडून करण्यात आलंय.

हे सुद्धा वाचा

पवना धरणात ९२ टक्के जलसाठा

पिंपरी चिंचवड आणि मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा 92.72 टक्के झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. वीज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये 1400 क्यूसेस विसर्ग केला जात आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून आवाहन

धरणातून पाणी सोडले जाणार असल्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे तत्काळ हलविण्यात यावेत, अशा सूचना पवना पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.