Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट

महाराष्ट्रात आठवडाभरापासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. राज्यात काही ठिकाणी अक्षरशः रेकॉर्डब्रेक तापमान एप्रिल महिन्यात गेले होते. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. अवकाळी पाऊस अन् गारपीटचा अंदाज व्यक्त केला आहे.

दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 9:11 AM

पुणे : राज्यातील वातावरणात एप्रिल महिन्यात मोठा बदल होत आहे. कधी तापमान ४० अंशावरपर्यंत जात आहे तर कधी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. एकीकडे सूर्यदेव कोपलेला असल्यामुळे राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना १३ व १४ एप्रिल रोजी यलो अलर्ट दिला आहे.

नवीन अंदाज काय

महाराष्ट्रात आठवडाभरापासून वातावरण मोठे बदल झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी अक्षरशः रेकॉर्डब्रेक तापमान एप्रिल महिन्यात झाले होते. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय. बुधवारी रात्री मुंबईत विजेच्या कडकडांसहीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच मुंबईत तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत सध्या तापमान ३१ डीग्री सेल्सियसवर पोहचलंय तर हवेतील आर्द्रता ४१ वर नोंद झाली आहे.

या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा दिला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, नागपूर आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढणारी माहिती जाहीर केली आहे. यामध्ये राज्यात दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये दिवसेंदिवस तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाल्याने वातावरणात उष्णता कायम राहणार आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात वाढ होणार आहे. आणि ते तापमान 43 अंशापर्यन्त जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

हे ही वाचा

शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता, IMD ने स्कायमेटचा अंदाज खोडला, यंदा मॉन्सून कसा असेल वाचा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.