AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे बस अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, चौकशी समिती केली तयार

pune bangalore highway bus accident : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताला दोन दिवस होत नाही तोपर्यंत पुन्हा एक गंभीर अपघात झाला आहे. खासगी बसच्या झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणी समिती स्थापन केलीय.

पुणे बस अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, चौकशी समिती केली तयार
road accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 2:28 PM

योगेश बोरसे, पुणे : कोल्हापूरवरुन मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला मध्यरात्री पुणे शहरातली कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातातील मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता प्रशासनानेही पावले उचलली आहे. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतर उपाययोजना करण्यात येणार आहे.

कसा झाला होता अपघात

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा भीषण रात्री 2:15 च्या सुमारास झाला. मध्यरात्री सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. कात्रज बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अपघातासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे समितीत

खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरवरुन डोंबिवलीला जात होती. नीता ट्रॅव्हल्सची ही बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरवरुन अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. आता या प्रकरणी समिती स्थापन केली आहे. या समितीत पुणे परिवहन आयुक्त, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

चौघांमध्ये दोन पुरुष, दोन महिला

अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे हे स्पष्ट झाले नाही. परंतु यानिमित्ताने पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता समिती काय अहवाल देणार? याकडेही लक्ष लागले आहे.

अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.