AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election Results 2022 : …तरीही विजय मिळाला नाही, तुम्हाला आत्मचिंतनाची गरज; पुण्यातले मनसे नेते योगेश खैरेंनी शिवसेनेवर साधला निशाणा

महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत झाला. शिवसेनेचे संजय पवार यांना धनंजय महाडिकांनी पराभूत केले. दुसरीकडे अपक्षांचा पाठिंबा घेऊन छत्रपती घराण्याला नको त्या अटी घातल्या, असा आरोप योगेश खैरेंनी केला.

Rajya Sabha Election Results 2022 : ...तरीही विजय मिळाला नाही, तुम्हाला आत्मचिंतनाची गरज; पुण्यातले मनसे नेते योगेश खैरेंनी शिवसेनेवर साधला निशाणा
राज्यसभा निवडणुकीवरून शिवसेनेवर टीका करताना मनसे नेते योगेश खैरेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 11, 2022 | 12:49 PM
Share

पुणे : संभाजीनगरमध्ये एमआयएमची स्क्रिप्ट वाचली. त्यांच्या नाकदुऱ्या काढून त्यांची मते मिळवली, असा आरोप मनसे नेते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यसभा निवडणुकीवरून मनसेने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. योगेश खैरे म्हणाले, की शिवसेनेने एमआयएम (MIM) तसेच सपासारख्या हिंदुत्वविरोधी पक्षांशी हातमिळवणी केली. मात्र एवढे करूनही विजय मिळालाच नाही. निवडणुकीत विजय-पराजय होतच असतात. मात्र एका निवडणुकीसाठी आपल्या तत्वांना आणि विचारांना किती तिलांजली द्यायची, याच्या सर्व मर्यादा शिवसेनेने (Shivsena) पार केल्या. एका राज्यसभा जागेसाठी आपण काय पणाला लावत आहोत, याचे भान ठेवायला पाहिजे होते, अशी टीका योगेश खैरे यांनी शिवसेनेवर केली. औरंगाबादच्या नामांतरावरूनही खैरे यांनी शिवसेना तसेच उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

‘नको त्या अटी मान्य केल्या’

महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यसभेच्या निवडणुकीत पराभूत झाला. शिवसेनेचे संजय पवार यांना धनंजय महाडिकांनी पराभूत केले. दुसरीकडे अपक्षांचा पाठिंबा घेऊन छत्रपती घराण्याला नको त्या अटी घातल्या. तर दोन-चार मते मिळवण्यासाठी समाजपादी पार्टी, एमआयएम यांच्या अटी मान्य केल्या. मात्र तरीही तुम्हाला विजय मिळाला नाही. औरंगाबादच्या सभेत एमआयएम तसेच सपाविषयी एक शब्दही काढला नाही. का तर पुढे राज्यसभेची निवडणूक होती, असा आरोप खैरे यांनी केला. तसेच हे सर्व करून काय मिळवले, याचे आत्मचिंतन करण्याची शिवसेना पक्षाला गरज आहे, असे खैरे म्हणाले.

आत्मचिंतनाची गरज

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला. सहावा उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या संजय पवार यांचा धनंजय महाडिक यांनी पराभव केला. पवार यांना केवळ 33 मते पडली. तर संख्याबळ नसतानाही महाडिक यांना 41 मते पडली. अपक्ष फुटल्याने हा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांनी काही अपक्ष आपल्या बाजूने वळते केले, त्यामुळे भाजपाच्या पारड्यात विजय पडला. आता यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेसह शिवसेनेतील काही नेतेदेखील आत्मचिंतन करण्याची गरज व्यक्त करीत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.