AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरजीलला अटक करा’, महापौर मोहोळ, जगदीश मुळीक पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार

हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी करत पुण्यातील भाजप नेते पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. | Pune police Should Arrest Sharjeel Usmani

'शरजीलला अटक करा', महापौर मोहोळ, जगदीश मुळीक पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार
mayor mohol, jagdish Mulik And Sharjeel Usmani
| Updated on: Feb 03, 2021 | 12:51 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मियांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी करत पुण्यातील भाजप नेते पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. शरजीलच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. (Pune police Should Arrest Sharjeel Usmani mayor Mohol And Jagdish mulik Will Meet Pune Commissioner)

मंगळवारी एल्गार परिषदेवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल त्यांनी केला होता. फडणवीसांच्या आक्रमक भूमिकेनंतर पुण्यातील भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोणत्याही परिस्थितीत हिंदूविरोधी वक्तव्ये करणाऱ्या शरजील उस्मानीला ताबडतोब अटक करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष आमदार जगदीश मुळीक यांनी केली आहे. आज (बुधवार) ते पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत.

ब्राह्मण महासंघही आक्रमक

एल्गार परिषदेचे आयोजक बी. जी. कोळसे पाटील यांच्या सहित सर्व आयोजकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ब्राम्हण महासंघाच्या वतीनं करण्यात आलीये. धार्मिक द्वेष पसरवून, हिंदु धर्म विरोधात वक्तव्ये करणाऱ्या वक्त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे पण तितकेच जबाबदार आहेत, असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले.

राज्यात सामाजिक तेढ निर्माण होऊन वक्त्यांवर गुन्हे दाखल होण्याची ही सलग दुसरी वेळ असून सुद्धा प्रशासन आयोजकांच्या गुन्ह्याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे, असा गंभीर आरोप दवे यांनी करत सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे.

काही ठराविक लोकांना बोलावून मुद्दाम हिंदु धर्माच्या बदनामीचा प्रयत्न करणाऱ्या एल्गारचे आयोजक कोळसे पाटील यांच्यासहित इतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ब्राम्हण महासंघाच्या वतीनं करण्यात आलीये. स्वारगेट पोलीस स्टेशनला तशा प्रकारच्या निवेदन महासंघाच्या वतीनं देण्यात आलंय.

काहीपण ऐकून घ्यायला हिंदू रस्त्यावर पडलेत का?, फडणवीसांची आक्रमक भूमिका

शरजील उस्मानी नावाचा कोणीतरी सडक्या डोक्याचा व्यक्ती एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य करतो. त्यानंतरही राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नाही. राज्यात मोगलाई आली आहे का, हिंदू रस्त्यावर पडलेत का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

राज्याचे गृहमंत्री म्हणतात या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करू. मात्र, शरजील उस्मानीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तो हिंदू समाजाला स्पष्टपणे सडका म्हटल्याचे ऐकायला मिळते. त्यानंतरही राज्य सरकार ऐकणार नसेल तर भाजप शांत बसणार नाही. आम्ही आंदोलन सुरु करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

‘एल्गार परिषदेला परवानगी दिलीच का?’

एल्गार परिषद ही समाजात तेढ पसरवण्यासाठी आणि आग ओकण्यासाठीच आयोजित केली जाते. याचा अनुभव असूनही सरकारने एल्गार परिषद आयोजित करण्यास परवानगी दिलीच का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही सरकारची मिलीभगत आहे का, अशी शंका उत्पन्न होते. मात्र, सरकारने शरजील उस्मानीविरोधात कारवाई केलीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.

(Pune police Should Arrest Sharjeel Usmani mayor Mohol And Jagdish mulik Will Meet Pune Commissioner)

हे ही वाचा :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.