Raj Thackeray : राज ठाकरे पुरग्रस्तांच्या भेटीला, पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांच्या जाणून घेतल्या अडचणी

Raj Thackeray in Pune : पुण्याला मुसळधार पावसाने झटका दिला. धरणाचे पाणी सोडल्याने पुण्यातील एकतानगरसह अनेक भागात पाणी शिरले होते. त्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले. काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज राज ठाकरे पुण्यात पोहचले आहेत. त्यांनी पुरग्रस्तांच्या अचडणी जाणून घेतल्या.

Raj Thackeray : राज ठाकरे पुरग्रस्तांच्या भेटीला, पुण्यातील एकतानगरमध्ये नागरिकांच्या जाणून घेतल्या अडचणी
राज ठाकरे पुरग्रस्तांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 12:23 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातील राजनगरमध्ये दाखल झाले आहेत. या भागाला नुकताच पुराचा फटका बसला होता. पुण्यासह परिसराला पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यात पुण्यातील एकतानगरसह अनेक रहिवाशी भागात पाणी शिरले. त्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर या भागातील मृतांना तातडीने मदत जाहीर झाली होती. आज राज ठाकरे एकतानगर भागात पुरग्रस्तांच्या भेटीला आले. त्यांनी यावेळी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाचा जोर वाढला, पुन्हा पूर भीती

पुण्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे धरणातून पावसाचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पुन्हा पाणी शिरण्याची भीती आहे. आजही काही भागांना पुराचा फटका बसू शकतो. त्यादृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सकाळपासूनच सुरु आहे. त्यात वाहनांचे आणि घरातील सामानाचे पुन्हा नुकसानीची भीती व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांनी साधला नागरिकांशी संवाद

यावेळी एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. एकतानगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी यावेळी पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांना प्रशासन मदत करत आहे की नाही याची माहिती घेतली. पाणी शिरल्याने त्यांना किती नुकसान झाले, याची माहिती घेतली. नागरिकांनी त्यांच्यासमोर कैफियत मांडली. कोणत्या अडचणी आल्या याची माहिती दिली. यावेळी नागरिकांनी प्रशासनावरील रोष पण व्यक्त केला.

काय म्हणाले राज ठाकरे

राज ठाकरे यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी शनिवारी मुख्यमंत्री घेतलेल्या भेटीची माहिती राज ठाकरे यांनी स्थानिक नागरिकांना दिली. पूरग्रस्तांच्या अडचणींवर चर्चा झाल्याचे माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे दोन तरुण विजेच्या धक्क्याने मृत पावली, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा धनादेश तात्काळ मंजूर केल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. हा धनादेश आज जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांशी कोण-कोणत्या विषयावर चर्चा झाली याची सविस्तर माहिती यावेळी राज ठाकरे यांनी येथील नागरिकांना भेटून दिली. तीन लाख परिसर असलेल्या एकतानगर परिसराला पूराचा फटका बसू नये यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तर सर्व परिसराचा पूनर्विकास करण्याबाबतची माहिती दिली. तर मयत दोन तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांचा धनादेश मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.