AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Landslide : रायगडमधील दरड कोसळून मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

रायगड जिल्ह्यातल महाड आणि पोलादपूर तालुक्यातील गावांमध्ये दरड कोसळून 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केलाय. तसंच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी दिलं आहे.

Raigad Landslide : रायगडमधील दरड कोसळून मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 4:54 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकूण 6 ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 35 घरं ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. त्यातून आतापर्यंत 38 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजून 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. तर रायगडमधील पोलादपूर तालुक्यात भूस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनांची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केलाय. तसंच महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचं आश्वासनही दिलं आहे. (More than 50 people died in landslide in Raigad district, PM Narendra Modi expressed grief on Twitter)

‘महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना. जखमी व्यक्त लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्यांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

तळीये गाव उद्ध्वस्त, 38 मृतदेह मिळाले

महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील जवळपास 35 घरांवर दरड कोसळून अनेक कुटुंब गाडली गेली आहे. काल दुपारी साडे चारच्या सुमारास ही या गावात दरड कोसळली. मात्र, संपूर्ण महाड शहर आणि सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं होतं. त्यामुळे मदतकार्यासाठी यंत्रणा पोहोचवणंही अवघड झालं. अखेर आज दुपारी 1 च्या सुमारास एनडीआरएफची टीम तळीये गावात पोहोचली. त्यावेळी नागरिकांनी 30 पेक्षा अधिक मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले होते. तर आतापर्यंत 38 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोलादपूर तालुक्यात भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावातही भूस्खलन झालं आहे. महाडच्या तळीये गावाप्रमाणेच पोलादपूर तालुक्यातील या दोन्ही गावात डोंगराचा काही भाग कोसळला. त्यात काही घरं गाडली गेली. त्यामुळे या दोन्ही गावातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतेय.

संबंधित बातम्या :

चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आला; व्हेंटिलेटरवरील 8 रुग्णांचा मृत्यू

Raigad Landslide : रायगडला हादरे सुरुच, आता पोलादपूरमध्ये भूस्खलनात 11 जण दगावले, राज्यभरात 70 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

More than 50 people died in landslide in Raigad district, PM Narendra Modi expressed grief on Twitter

भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश
युद्धाच्या भीतीनं पाकची झोप उडाली, लोक उपाशी राहू नये म्हणून एकच आदेश.
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?
'93 हजार पाक सैनिकांचे आत्मसमर्पण...', धवननंतर आफ्रिदीला कुणी सुनावलं?.