Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा?

लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे 'मातोश्री'सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका.

50 वर्षे 'मातोश्री'सोबत काढली, आम्हाला तोंड उघडायला लावू नका? रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा?
Follow us
| Updated on: Feb 15, 2025 | 4:27 PM

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले. शिवसेनाप्रमुख स्वत: मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही. परंतु उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. त्यांनी मुख्यमंत्री पद घेतले नसते तर शिवसेना फुटली नसती. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत, त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावे लागेल. लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा, असा इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी रामदास कदम बोलत होते.

असा मुख्यमंत्री पहिला नाही…

शिवसेना प्रमुखांनी कमावले तुमचे त्यात काय योगदान आहे. तुम्हाला सर्व आयते मिळाले, असा हल्ला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर चढवला. ते म्हणाले, कोकणातील ही भगवी लाट पाहिली. आनंद झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवले. एकनाश शिंदे यांनी दिवसरात्र काम केले. मी अनेक वर्ष विधिमंडळात होतो. पण रात्रंदिवस काम करणारा असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असे रामदास कदम यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

रामदास कदम यांना आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, कोणाची चुक झाली, याबाबत तुम्ही आत्मपरिक्षण केले पाहिजे. ते एवढेसे पिल्लू पेग्विन आम्हाला शिकवतो. तुमची औकत काय? सर्व शिवसेना प्रमुखांनी कमवले, तुमचे योगदान काय? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.