AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन मद्यविक्री, महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित

महाराष्ट्रात देशी दारुची 3 हजार 327 आणि विदेशी मद्याची 1 हजार 348 दुकानं, तर 3 हजार 463 वाईन शॉप सुरु झाली आहेत (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

मिशन मद्यविक्री, महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित
| Updated on: May 05, 2020 | 11:17 AM
Share

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या नियमात अंशतः शिथिलता आणत एकल दुकानांमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात 8 हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाली असून महिन्याभरात राज्य सरकारला मद्यविक्रीतून 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे. (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

महाराष्ट्रात देशी दारुची 3 हजार 327 आणि विदेशी मद्याची 1 हजार 348 दुकानं, तर 3 हजार 463 वाईन शॉप सुरु झाली आहेत. राज्यात आठ हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाल्याने दररोज 80 कोटींच्या महसुलाची सरकारला अपेक्षा आहे. मे महिन्याच्या अखेपर्यंत 2100 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला अपेक्षित आहे. 4 मेपासून राज्यात मद्यविक्री सुरु झाल्याने 28 दिवसात 2100 कोटी मिळण्याची आशा आहे.

हेही वाचा : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री

कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्येही मद्यविक्रीच्या दुकानांना सशर्त मुभा देण्याचं जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ग्राहकांनी नियम पायदळी तुडवत दारुच्या दुकानांबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

मद्यप्रेमींच्या लांबलचक रांगांमुळे पोलिसांवर काही ठिकाणी दारुची दुकाने बंद करण्याची वेळ आली. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने भारतात 45 दिवसाहून अधिक काळ ‘लिकर स्टोअर्स’ बंद आहेत.

मद्य खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना एकमेकांपासून सहा फुटांचे अंतर राखावे लागणार आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात नसतील, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. मात्र सर्रास हे नियम धाब्यावर बसवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

उत्पादन शुल्क हे राज्य सरकारच्या अखत्यारित येते. मद्यावरील कर (उत्पादन शुल्क) हा राज्यांच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक मानला जातो. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा कर हातभार लावू शकतो, असं बोललं जातं. (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

कुठे काय स्थिती?

मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूरमध्ये वाईन शॉप बंद असतानाच दुकानाबाहेर काही मद्यपी घुटमळत होते. वसई, विरार आणि नालासोपारामध्येही वाईन शॉपबाहेर लोकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या.

पुण्यात दारुची दुकानं न उघडल्याने काल सकाळी तळीराम हिरमुसले होते. नंतर ग्रीन सिग्नल मिळताच पुन्हा गर्दी झाली होती. पण पोलिसांना ही गर्दी हटवावी लागली. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्रीवरील बंदी कायम आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतरही सोलापूर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अमरावती अशा काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.

औरंगाबादेत दारूची दुकाने उघडण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध  आहे. औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला. (Revenue worth Rs 2100 crore expected by liquor sale in Maharashtra)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.