AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता मुंबईला जायचंच; मनोज जरांगे यांचा पदयात्रेचा मार्ग ठरला; जरांगेंचं मराठा आंदोलकांना महत्वाचं

Manoj Jarange Patil on Mumbai Daura For Maratha Reservation : पीठ, सरपण, चुली सारं सोबत घ्या, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मनाठा आंदोलकांना केलं आहे. काहीही झालं तरी मुंबईत येऊन आंदोलन करायचंच, असा निर्धार मनोज जरांगे यांनी केलं आहे. जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा...

आता मुंबईला जायचंच; मनोज जरांगे यांचा पदयात्रेचा मार्ग ठरला; जरांगेंचं मराठा आंदोलकांना महत्वाचं
manoj jarange
| Updated on: Dec 28, 2023 | 12:47 PM
Share

दत्ता कानवटे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 28 डिसेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा राहिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करण्यात इशारा दिला आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी या आंदोलनावर भाष्य केलं आहे. मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं आहे. जालन्यातील अंतरवली सराटी ते मुंबई अशी ही पदयात्रा असेल. विविध गावांमधून प्रवास करत मराठा आंदलोकांसह मनोज जरांगे मुंबईत दाखल होतील. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे.

जरांगेंचं आंदोलकांना आवाहन

रोज वापरासाठी लागत असलेल्या वस्तू सोबत घेण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केलं आहे. मुंबईत जाईपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी लागणार नाही. मात्र तिथं गेल्यावर आपल्याला आपलं सामान बाहेर काढावं लागेल. शक्य असेल तर पाण्याचे टँकर, रुग्ण वाहिका सोबत घ्या. पीठ, सरपण, चुली, बादल्या, ताटं, तांब्या, कपडे चटई हे सगळं सोबत घ्या. रिक्षा, चारचाकी गाडीमधील मागील सिट काढून घ्या आणि झोपायची व्यवस्था करा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे.

सारे सारे या… – जरांगे

भजन करणाऱ्या मंडळींनी, टाळकरी मंडळी यांनी यावं ही विनंती आहे. गावगावांतील हलगी पथक, गावागावातील गणपती मंडळाचे ढोल घ्यावेत. पोवाडे म्हणणारे, शिवशाहीर किंवा शिकणारे शिवशाहीर असतील तर ना नफा न तोटा तत्त्वावर यावे मनोबल वाढविण्यासाठी यावं. जागरण गोंधळ करणारे, भरुडकार यांनी सोबत यावे, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय. जो हॉटेल चालक ना तोटा ना नफा या तत्त्वावर कुणी स्टॉल टाकत असेल तर चालेल. सरकारने फक्त आंघोळीची आणि प्रातविधीची सोय करावी, असं जरांगे म्हणालेत.

हरिभाऊ राठोड यांनी अर्ध वाचलंय. त्यांच्या आरक्षणामुळे आम्हाला अर्धा आरक्षण मिळत आहे. पूर्ण वाचल्यानंतर सांगू. पक्कं झाल्याशिवाय त्यांनी गडबड करू नये. त्यांच्या फोर्मुल्यावर सगळ्या मराठ्यांचा कल्याण होईल असं वाटत नाही, असंही जरांगेंनी म्हटलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.